शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मस्कतमध्ये महिलांना गुलामांप्रमाणे विकले जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:29 IST

मुंबईच्या फरिदाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितल्या आपल्या व्यथा

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : अवैध पद्धतीने मस्कतला पाठवण्यात आलेल्या आणि तिथे गुलामासारखे बंदिस्त असलेल्या अंबरनाथच्या फरिदा यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितले की, तिथे महिलांना गुलामाप्रमाणेच विकले जाते.महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह फरिदा यांनी स्वराज यांची भेट घेतली. फरिदा म्हणाल्या की, भारतात जाण्याचा विषय काढताच, आपणास एक आठवडा उपाशी ठेवले. या सर्वामागे एक टोळी असून, त्या टोळीचा शिकार बनलो होतो. पंजाबमधील सुरजीत व चेन्नईतील बरकत उर्फ फातिमा हीही आमच्यासोबत होती.सुषमा स्वराज यांना त्याची माहिती मस्कतहून कळवली जाताच, राज्य महिला आयोग परराष्ट्र मंत्रालयाने विमानाद्वारे त्यांना इथे आणण्याची व्यवस्था केली.परदेशस्थ भारतीय विवाह तसेच महिला व मुलींची तस्करी या विषयावरील चर्चासत्रासाठी आलेल्या फरिदा यांना भेटल्यानंतर स्वराज म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत १ लाख ३६६ हजार भारतीयांना त्यांची जात, धर्म, पंथ न पाहता परदेशांतून परत आणण्यात आले आहे. अनधिकृत एजंटांची माहिती लोकांनीच प्रशासन व पोलिसांना द्यायला हवी. शिवाय, अधिकृत एजंटांची नावे परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत.नवा कायदाभारतामध्ये विवाह करून विदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी ठकसेन नवरदेवांची देशात असलेली संपत्ती जप्त करण्यासाठी कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. असे नवरदेव तसेच विदेशात पलायन केलेल्या अन्य आरोपींवर जारी करण्यात आलेली समन्स, वॉरंट यांची माहिती देणारी एक वेबसाइटही सुरू करण्यात येणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. अनिवासी ठकसेन नवरदेवांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या १५ हजार वधू एकट्या पंजाब राज्यामध्ये आहेत.तस्करीचा नवा प्रकारस्वराज म्हणाल्या की, अमेरिकेत शरणार्थीचा दर्जा मिळवून देतो, नंतर नागरिकत्व मिळेल, असे सांगून एजंट २५ ते ३0 लाख रुपये घेतात. त्यांना मेक्सिकोमार्ग अमेरिकेत नेतात.तिथे पकडले जाताच, आपण राजकीय शरणार्थी असल्याचे सांगण्यास भाग पाडतात. त्यासाठी आमच्या कुटुंबाच्या जीवाला भारतात धोका असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस, भाजपा, आप सरकारकडून धोका असल्याची बतावणी केली जाते.गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ५२, १0१ व ३४0 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीSushma Swarajसुषमा स्वराज