शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

मस्कतमध्ये महिलांना गुलामांप्रमाणे विकले जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:29 IST

मुंबईच्या फरिदाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितल्या आपल्या व्यथा

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : अवैध पद्धतीने मस्कतला पाठवण्यात आलेल्या आणि तिथे गुलामासारखे बंदिस्त असलेल्या अंबरनाथच्या फरिदा यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितले की, तिथे महिलांना गुलामाप्रमाणेच विकले जाते.महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह फरिदा यांनी स्वराज यांची भेट घेतली. फरिदा म्हणाल्या की, भारतात जाण्याचा विषय काढताच, आपणास एक आठवडा उपाशी ठेवले. या सर्वामागे एक टोळी असून, त्या टोळीचा शिकार बनलो होतो. पंजाबमधील सुरजीत व चेन्नईतील बरकत उर्फ फातिमा हीही आमच्यासोबत होती.सुषमा स्वराज यांना त्याची माहिती मस्कतहून कळवली जाताच, राज्य महिला आयोग परराष्ट्र मंत्रालयाने विमानाद्वारे त्यांना इथे आणण्याची व्यवस्था केली.परदेशस्थ भारतीय विवाह तसेच महिला व मुलींची तस्करी या विषयावरील चर्चासत्रासाठी आलेल्या फरिदा यांना भेटल्यानंतर स्वराज म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत १ लाख ३६६ हजार भारतीयांना त्यांची जात, धर्म, पंथ न पाहता परदेशांतून परत आणण्यात आले आहे. अनधिकृत एजंटांची माहिती लोकांनीच प्रशासन व पोलिसांना द्यायला हवी. शिवाय, अधिकृत एजंटांची नावे परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत.नवा कायदाभारतामध्ये विवाह करून विदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी ठकसेन नवरदेवांची देशात असलेली संपत्ती जप्त करण्यासाठी कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. असे नवरदेव तसेच विदेशात पलायन केलेल्या अन्य आरोपींवर जारी करण्यात आलेली समन्स, वॉरंट यांची माहिती देणारी एक वेबसाइटही सुरू करण्यात येणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. अनिवासी ठकसेन नवरदेवांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या १५ हजार वधू एकट्या पंजाब राज्यामध्ये आहेत.तस्करीचा नवा प्रकारस्वराज म्हणाल्या की, अमेरिकेत शरणार्थीचा दर्जा मिळवून देतो, नंतर नागरिकत्व मिळेल, असे सांगून एजंट २५ ते ३0 लाख रुपये घेतात. त्यांना मेक्सिकोमार्ग अमेरिकेत नेतात.तिथे पकडले जाताच, आपण राजकीय शरणार्थी असल्याचे सांगण्यास भाग पाडतात. त्यासाठी आमच्या कुटुंबाच्या जीवाला भारतात धोका असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस, भाजपा, आप सरकारकडून धोका असल्याची बतावणी केली जाते.गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ५२, १0१ व ३४0 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीSushma Swarajसुषमा स्वराज