शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

तिघा विचारवंतांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही

By admin | Updated: December 3, 2015 03:15 IST

पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही

नवी दिल्ली : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही स्पष्टोक्ती दिली. पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी संबंध आहे, अशा आशयाचा कुठलाही अहवाल नाही, असे रिजीजू यांनी सांगितले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात रडारवर आलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पानसरे हत्याप्रकरणी सनातनच्या एका साधकास अटक करण्यात आल्यापासून या वादग्रस्त संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. क्रॉमेड व लेखक पानसरे यांच्यावर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथे १६ फेबु्रवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पानसरेंची प्राणज्योत मालवली होती. यापूर्वी २० आॅगस्ट २०१३ रोजी पुरोगामी विचारवंत आणि लेखक नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती, तर ३० आॅगस्ट २०१५ रोजी कन्नड विचारवंत कलबुर्गी यांचीही कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)