शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

तिघा विचारवंतांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही

By admin | Updated: December 3, 2015 03:15 IST

पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही

नवी दिल्ली : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही स्पष्टोक्ती दिली. पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी संबंध आहे, अशा आशयाचा कुठलाही अहवाल नाही, असे रिजीजू यांनी सांगितले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात रडारवर आलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पानसरे हत्याप्रकरणी सनातनच्या एका साधकास अटक करण्यात आल्यापासून या वादग्रस्त संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. क्रॉमेड व लेखक पानसरे यांच्यावर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथे १६ फेबु्रवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पानसरेंची प्राणज्योत मालवली होती. यापूर्वी २० आॅगस्ट २०१३ रोजी पुरोगामी विचारवंत आणि लेखक नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती, तर ३० आॅगस्ट २०१५ रोजी कन्नड विचारवंत कलबुर्गी यांचीही कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)