शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तिघा विचारवंतांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही

By admin | Updated: December 3, 2015 03:15 IST

पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही

नवी दिल्ली : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही स्पष्टोक्ती दिली. पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी संबंध आहे, अशा आशयाचा कुठलाही अहवाल नाही, असे रिजीजू यांनी सांगितले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात रडारवर आलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पानसरे हत्याप्रकरणी सनातनच्या एका साधकास अटक करण्यात आल्यापासून या वादग्रस्त संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. क्रॉमेड व लेखक पानसरे यांच्यावर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथे १६ फेबु्रवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पानसरेंची प्राणज्योत मालवली होती. यापूर्वी २० आॅगस्ट २०१३ रोजी पुरोगामी विचारवंत आणि लेखक नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती, तर ३० आॅगस्ट २०१५ रोजी कन्नड विचारवंत कलबुर्गी यांचीही कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)