शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

महापालिकेची आर्थिक चिंता वाढली 12 कोटींचा भुर्दंड: डीपीसीत नगरोत्थानचा प्रस्ताव अमान्य

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

सोलापूर : जिल्हा नगरोत्थान योजनेतून केलेल्या कामाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्याने 12 कोटींचा निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमान्य केल्यामुळे महापालिकेची आर्थिक चिंता वाढली आहे.

सोलापूर : जिल्हा नगरोत्थान योजनेतून केलेल्या कामाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्याने 12 कोटींचा निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमान्य केल्यामुळे महापालिकेची आर्थिक चिंता वाढली आहे.
एलबीटी व पारगमन शुल्क रद्द झाल्यापासून महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली. दरमहा कर्मचार्‍यांचे वेतन व वीज बिल भरण्यासाठी प्रशासनाला दरमहा कसरत करावी लागत आहे. अशात विकासकामे कशी मार्गी लावयाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा नगरोत्थान व इतर योजनांतून मोठी कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. यात महापालिकेचा निम्मा हिस्सा आहे. रस्ते, ड्रेनेज व बागा, स्मशानभूमीचे सुशोभीकरण व वॉर्डातील कामे या योजनेतून हाती घेण्यात आली आहेत. शासनाचा उर्वरित निधी मिळावा म्हणून आयुक्त काळम?पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस व नगरविकास खात्याचे सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. म्हैसकर यांनी निधी लवकर उपलब्ध केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्च्या बैठकीत जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून घेतलेल्या कामाची चर्चा झाली. महापालिकेतर्फे 49 कोटी 74 लाखांच्या 71 कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातून 45 कोटींची कामे हाती घेण्यात आली. यात शासन अनुदानाचा 24 कोटी 86 लाख इतका हिस्सा आहे. यातील 90 टक्के कामे पूर्णत्वावर आहेत. यासाठी 30 एप्रिल 2014 रोजी 9 कोटी 12 लाख व 17 मार्च 2015 रोजी 3 कोटी 38 लाख असे 12 कोटी 43 लाख अनुदान मिळाले. महापालिकेने हिश्श्यापेक्षा जास्त म्हणजे 14 कोटी 97 हजार खर्ची घातले आहेत. 12 कोटी अनुदान अपेक्षित असताना 31 मार्च 2015 रोजी मुदत संपल्याने पैसे देता येणार नाहीत असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे.
इन्फो..
पालकमंत्र्यांचे आश्वासन
चर्चेवेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर आ. सुभाष देशमुख, आ. गणपतराव देशमुख यांनी आयुक्तांना याबाबत खुलासा करण्याचे सुचित केले. आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी महापालिकेची स्थिती सांगितली. त्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हा गुंता सोडविण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कोट..
जिल्हाधिकारी कार्यालयाने कामांना मंजुरी दिलेल्या पत्रात 29 दिवसांच्या फरकाने दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तांत्रिक मुद्दा असल्याने मार्ग निघेल अशी आशा आहे.
विजयकुमार काळम-पाटील
आयुक्त,महापालिका