शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची आर्थिक चिंता वाढली 12 कोटींचा भुर्दंड: डीपीसीत नगरोत्थानचा प्रस्ताव अमान्य

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

सोलापूर : जिल्हा नगरोत्थान योजनेतून केलेल्या कामाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्याने 12 कोटींचा निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमान्य केल्यामुळे महापालिकेची आर्थिक चिंता वाढली आहे.

सोलापूर : जिल्हा नगरोत्थान योजनेतून केलेल्या कामाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्याने 12 कोटींचा निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमान्य केल्यामुळे महापालिकेची आर्थिक चिंता वाढली आहे.
एलबीटी व पारगमन शुल्क रद्द झाल्यापासून महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली. दरमहा कर्मचार्‍यांचे वेतन व वीज बिल भरण्यासाठी प्रशासनाला दरमहा कसरत करावी लागत आहे. अशात विकासकामे कशी मार्गी लावयाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा नगरोत्थान व इतर योजनांतून मोठी कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. यात महापालिकेचा निम्मा हिस्सा आहे. रस्ते, ड्रेनेज व बागा, स्मशानभूमीचे सुशोभीकरण व वॉर्डातील कामे या योजनेतून हाती घेण्यात आली आहेत. शासनाचा उर्वरित निधी मिळावा म्हणून आयुक्त काळम?पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस व नगरविकास खात्याचे सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. म्हैसकर यांनी निधी लवकर उपलब्ध केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्च्या बैठकीत जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून घेतलेल्या कामाची चर्चा झाली. महापालिकेतर्फे 49 कोटी 74 लाखांच्या 71 कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातून 45 कोटींची कामे हाती घेण्यात आली. यात शासन अनुदानाचा 24 कोटी 86 लाख इतका हिस्सा आहे. यातील 90 टक्के कामे पूर्णत्वावर आहेत. यासाठी 30 एप्रिल 2014 रोजी 9 कोटी 12 लाख व 17 मार्च 2015 रोजी 3 कोटी 38 लाख असे 12 कोटी 43 लाख अनुदान मिळाले. महापालिकेने हिश्श्यापेक्षा जास्त म्हणजे 14 कोटी 97 हजार खर्ची घातले आहेत. 12 कोटी अनुदान अपेक्षित असताना 31 मार्च 2015 रोजी मुदत संपल्याने पैसे देता येणार नाहीत असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे.
इन्फो..
पालकमंत्र्यांचे आश्वासन
चर्चेवेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर आ. सुभाष देशमुख, आ. गणपतराव देशमुख यांनी आयुक्तांना याबाबत खुलासा करण्याचे सुचित केले. आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी महापालिकेची स्थिती सांगितली. त्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हा गुंता सोडविण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कोट..
जिल्हाधिकारी कार्यालयाने कामांना मंजुरी दिलेल्या पत्रात 29 दिवसांच्या फरकाने दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तांत्रिक मुद्दा असल्याने मार्ग निघेल अशी आशा आहे.
विजयकुमार काळम-पाटील
आयुक्त,महापालिका