शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीची कार्यवाही

By admin | Updated: December 14, 2015 19:11 IST

विद्यमान संचालक मंडळाने कामकाज करावे

विद्यमान संचालक मंडळाने कामकाज करावे
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही सुरू करावी. निवडणुकीपर्यंत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज करावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश एच.पाटील व न्यायाधीश एस.बी. शुक्रे यांनी दिले आहेत. सोमवारी कृउबाच्या निवडणुकीसंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात कामकाज झाले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची त्वरित निवडणूक घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात निमगाव वाकडा येथील रंगनाथ गायकर व वेळापूर येथील नारायण पालवे व ॲड. प्रमोद जोशी यांनी याचिका दाखल केली होती. बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांच्यासह संचालकांच्या वतीने ॲड. सुरेश सबरद यांनी दाखल केलेली याचिकाही सोमवारी सुनावणीस आली. या याचिकेत संचालक मंडळाची मुदत दि. ३ नोव्हेंबर रोजी संपलेली असली तरी हे संचालक मंडळ कार्यरत ठेवून निवडणूक घेण्यात यावी, असे म्हटले आहे. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील बाजार समितीच्या होणार्‍या निवडणुका येत्या सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शासनाच्या सहकार व वस्त्र उद्योग विभागाच्या वतीने आदेश काढून आदेशाच्या दिनांकापासून सहा महिने मुदतीकरिता या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
याचिकेत सध्या सर्वच सहकारी संस्था निवडणुका सुरू असताना केवळ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता पावसामुळे निवडणुका थांबविणे अयोग्य आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी आहे. मागील ७ तारखेला शासनाला प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाची मुदत दि. ३ नोव्हेंबर रोजी संपलेली आहे.
दरम्यान, बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार माजी आमदार कल्याणराव पाटील यांची मुख्य प्रशासक तर सुधीर विलास कराड यांची उपमुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे आदेश क्र मांक १०१५/६२०/११ दि. १० डिसेंबर २०१५ रोजी नागपूर येथील शिबिर कार्यालयातील कक्ष अधिकारी य.ग. पाटील यांच्या सहीने जिल्हा उपनिबंधक यांना नवनियुक्त अशासकीय प्रशासक मंडळाची यादी पाठविण्यात आली आहे.
या प्रशासकीय मंडळाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांची मुख्य प्रशासक तर सुधीर विलास कराड यांची उपमुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय मंडळात कैलास रामनारायण सोनवणे, रा.विंचूर, किरण विनायक कुलकर्णी, रा.देवगाव, नानासाहेब दत्ताजी पाटील, रा.लासलगाव, छोटू वामन पानगव्हाणे, रा.उगाव, वैकुंठ विजय पाटील, रा.कुंदेवाडी, संपत शंकर नागरे, रा. डोंगरगाव, शिवाजी बंडू सुरासे, रा.टाकळी विंचूर, अण्णासाहेब किसन जगताप, रा.मरळगोई, भास्कर दामोधर आवारे, रा.वाकद शिरवाडे, बाळासाहेब दामोदर जगताप, रा.लासलगाव, ज्ञानेश्वर भागवत तासकर, रा. रुई, विकास विनायक रायते, रा. खडकमाळेगाव, राजेंद्र लक्ष्मण घायाळ, रा. नैताळे, साहेबराव रामकृष्ण पानगव्हाणे, रा.उगाव, नंदू रामदास कापसे, रा.निफाड, अनंत रामदास साळे, रा.पिंपळस यांची नियुक्ती करण्याकरिता कळविले आहे. परंतु त्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी अधिकृतपत्र बाजार समितीला पाठविलेले नाही. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यामुळे आता शासकीय मंडळ येण्याची शक्यता मावळली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती हाती आली आहे.