शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

मुंबई फिचर

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

रेल्वे प्रकल्प अडले, विकासाचे गणित बिघडले

रेल्वे प्रकल्प अडले, विकासाचे गणित बिघडले
निधीचा तुटवडा : विदर्भातील प्रकल्प दुर्लक्षितच
दयानंद पाईकराव
नागपूर : कुठल्याही भागात रेल्वेचे जाळे असले की त्या भागाचा आपोआप विकास होतो. शेती, उद्योगधंदे भरभराटीस येतात. परंतु विदर्भात सर्वदूर रेल्वेचे जाळेच नसल्यामुळे विदर्भाचा हवा तेवढा विकास अद्याप झालेला नाही. मागील पाच वर्षांपासून विदर्भासाठी घोषणा केलेले प्रकल्प अद्यापही रखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे विदर्भाच्या विकासाला खीळ बसल्याची स्थिती आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात येते. परंतु घोषणा केलेल्या प्रकल्पांना कासवगतीने निधीचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पांची किंमत दिवसेंदिवस वाढत जाऊन हे प्रकल्प रखडले जातात. विदर्भासाठी घोषित करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या बाबतीतही आजपर्यंत नेमके हेच घडले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भासाठी प्रकल्पांची घोषणा तर झाली. परंतु हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हवी ती पावले न उचलल्या गेल्यामुळे हे प्रकल्प आजही अपूर्णच राहिले. दिवसेंदिवस या प्रकल्पांची किंमत वाढत असून प्रकल्प रखडल्यामुळे संबंधित भागाच्या विकासावर त्याचा विपरीत परीणाम झाला आहे.
...............
वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्प रखडला
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९ च्या रेल्वे अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यावेळी २७० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची किंमत ६९७ कोटी रुपये होती. यवतमाळ येथे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी प्रकल्पाचा शिलान्यास केला. या प्रकल्पासाठी २००९-१० मध्ये १५ कोटी, २०१०-११ मध्ये ४० कोटी, २०११-१२ मध्ये ४० कोटी, २०१२-१३ मध्ये १५ कोटी अशा पद्धतीने निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे हा प्रकल्प गती घेऊ शकला नाही. सध्या राज्य शासनाच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. मागील सहा वर्षात वर्धा ते यवतमाळ दरम्यान फक्त ३३ किलोमीटर जमीन अधिग्रहित करण्यात आली. प्रकल्पाची किंमतही ६९७ कोटींवरून १६०० कोटींवर पोहोचली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या भागात रेल्वेचे जाळे पसरल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशभरात रेल्वेच्या माध्यमातून बाजारपेठ मिळून त्यांचा विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार विजय दर्डा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.