शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुंबई फिचर

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

रेल्वे प्रकल्प अडले, विकासाचे गणित बिघडले

रेल्वे प्रकल्प अडले, विकासाचे गणित बिघडले
निधीचा तुटवडा : विदर्भातील प्रकल्प दुर्लक्षितच
दयानंद पाईकराव
नागपूर : कुठल्याही भागात रेल्वेचे जाळे असले की त्या भागाचा आपोआप विकास होतो. शेती, उद्योगधंदे भरभराटीस येतात. परंतु विदर्भात सर्वदूर रेल्वेचे जाळेच नसल्यामुळे विदर्भाचा हवा तेवढा विकास अद्याप झालेला नाही. मागील पाच वर्षांपासून विदर्भासाठी घोषणा केलेले प्रकल्प अद्यापही रखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे विदर्भाच्या विकासाला खीळ बसल्याची स्थिती आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात येते. परंतु घोषणा केलेल्या प्रकल्पांना कासवगतीने निधीचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पांची किंमत दिवसेंदिवस वाढत जाऊन हे प्रकल्प रखडले जातात. विदर्भासाठी घोषित करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या बाबतीतही आजपर्यंत नेमके हेच घडले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भासाठी प्रकल्पांची घोषणा तर झाली. परंतु हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हवी ती पावले न उचलल्या गेल्यामुळे हे प्रकल्प आजही अपूर्णच राहिले. दिवसेंदिवस या प्रकल्पांची किंमत वाढत असून प्रकल्प रखडल्यामुळे संबंधित भागाच्या विकासावर त्याचा विपरीत परीणाम झाला आहे.
...............
वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्प रखडला
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९ च्या रेल्वे अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यावेळी २७० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची किंमत ६९७ कोटी रुपये होती. यवतमाळ येथे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी प्रकल्पाचा शिलान्यास केला. या प्रकल्पासाठी २००९-१० मध्ये १५ कोटी, २०१०-११ मध्ये ४० कोटी, २०११-१२ मध्ये ४० कोटी, २०१२-१३ मध्ये १५ कोटी अशा पद्धतीने निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे हा प्रकल्प गती घेऊ शकला नाही. सध्या राज्य शासनाच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. मागील सहा वर्षात वर्धा ते यवतमाळ दरम्यान फक्त ३३ किलोमीटर जमीन अधिग्रहित करण्यात आली. प्रकल्पाची किंमतही ६९७ कोटींवरून १६०० कोटींवर पोहोचली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या भागात रेल्वेचे जाळे पसरल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशभरात रेल्वेच्या माध्यमातून बाजारपेठ मिळून त्यांचा विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार विजय दर्डा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.