शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मुलायमसिंग यांची लालूंकडून मनधरणी

By admin | Updated: September 4, 2015 23:43 IST

समाजवादी पार्टी बिहारमधील भाजपाविरोधी आघाडीमधून अचानकपणे बाहेर पडल्याने थक्क झालेले संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव

नवी दिल्ली : समाजवादी पार्टी बिहारमधील भाजपाविरोधी आघाडीमधून अचानकपणे बाहेर पडल्याने थक्क झालेले संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आघाडी वाचविण्यासाठी शुक्रवारी मुलायमसिंग यांची भेट घेतली; परंतु सपाप्रमुखाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळविण्यात त्यांना अपयश आले.राजद, संजद आणि काँग्रेसने जागा वाटपाबाबत पक्षाशी मुळीच संपर्क साधला नाही. हा आपला घोर अवमान आहे, असे सांगत सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा गुरुवारी लखनौ येथे केली होती. या घोषणेमुळे हादरलेल्या संजद आणि राजद यांनी आता आघाडी वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.‘चर्चा सुरू आहे. चर्चा सुरूच राहील. सर्व २०० जागा नेताजी (मुलायमसिंग) आणि समाजवादी पार्टीच्याच आहेत. एकत्र आलो तेव्हा भाजपाला पराभूत करू असा संदेश देशात गेला होता. ते (मुलायमसिंग) आमचे संरक्षक आहेत. देशाला सांप्रदायिकतेपासून धोका आहे. सांप्रदायिकता नष्ट व्हावी, असे सर्वांनाच वाटते. बिहारमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावे यासाठी आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही नेताजींना केली आहे,’ असे लालूप्रसाद यादव म्हणाले. मुलायमसिंग यांच्यासोबत दोन तास चाललेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लालूप्रसाद यांच्यासह शरद यादव यांनीही मुलायमसिंग यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सपाप्रमुखाकडून कोणतेही आश्वासन मिळाले नसले तरी शरद यादव यांनी ‘सर्वकाही ठीक होईल,’ अशी आशा व्यक्त केली. चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत आनंदाची वार्ता कळेल. हा जागांचा वाद नाही. काही अंतर्गत बाबी आहेत, ज्यावर मीडियाशी चर्चा करता येणार नाही, असे शरद यादव म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेशात आपला राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला आघाडीत स्थान मिळाल्यामुळे मुलायमसिंग यादव नाराज असल्याचे सपाच्या एका नेत्याने सांगितले.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्यापूर्वी पक्षाशी संपर्क न साधणाऱ्या राजद, संजद आणि काँग्रेसने आपला घोर अवमान केला, असा आरोप करून सपाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या जागावाटप फार्म्युल्याअंतर्गत राजदने ९८, संजदने १०० आणि काँग्रेसने ४० जागा स्वत:कडे ठेवून सपासाठी केवळ पाच जागा सोडल्या होत्या. दरम्यान, या मुद्यावर तोडगा निघेल आणि सपा महाआघाडीत परत येईल, अशी आशा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे.