शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुलायमसिंग यांची लालूंकडून मनधरणी

By admin | Updated: September 4, 2015 23:43 IST

समाजवादी पार्टी बिहारमधील भाजपाविरोधी आघाडीमधून अचानकपणे बाहेर पडल्याने थक्क झालेले संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव

नवी दिल्ली : समाजवादी पार्टी बिहारमधील भाजपाविरोधी आघाडीमधून अचानकपणे बाहेर पडल्याने थक्क झालेले संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आघाडी वाचविण्यासाठी शुक्रवारी मुलायमसिंग यांची भेट घेतली; परंतु सपाप्रमुखाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळविण्यात त्यांना अपयश आले.राजद, संजद आणि काँग्रेसने जागा वाटपाबाबत पक्षाशी मुळीच संपर्क साधला नाही. हा आपला घोर अवमान आहे, असे सांगत सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा गुरुवारी लखनौ येथे केली होती. या घोषणेमुळे हादरलेल्या संजद आणि राजद यांनी आता आघाडी वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.‘चर्चा सुरू आहे. चर्चा सुरूच राहील. सर्व २०० जागा नेताजी (मुलायमसिंग) आणि समाजवादी पार्टीच्याच आहेत. एकत्र आलो तेव्हा भाजपाला पराभूत करू असा संदेश देशात गेला होता. ते (मुलायमसिंग) आमचे संरक्षक आहेत. देशाला सांप्रदायिकतेपासून धोका आहे. सांप्रदायिकता नष्ट व्हावी, असे सर्वांनाच वाटते. बिहारमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावे यासाठी आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही नेताजींना केली आहे,’ असे लालूप्रसाद यादव म्हणाले. मुलायमसिंग यांच्यासोबत दोन तास चाललेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लालूप्रसाद यांच्यासह शरद यादव यांनीही मुलायमसिंग यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सपाप्रमुखाकडून कोणतेही आश्वासन मिळाले नसले तरी शरद यादव यांनी ‘सर्वकाही ठीक होईल,’ अशी आशा व्यक्त केली. चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत आनंदाची वार्ता कळेल. हा जागांचा वाद नाही. काही अंतर्गत बाबी आहेत, ज्यावर मीडियाशी चर्चा करता येणार नाही, असे शरद यादव म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेशात आपला राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला आघाडीत स्थान मिळाल्यामुळे मुलायमसिंग यादव नाराज असल्याचे सपाच्या एका नेत्याने सांगितले.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्यापूर्वी पक्षाशी संपर्क न साधणाऱ्या राजद, संजद आणि काँग्रेसने आपला घोर अवमान केला, असा आरोप करून सपाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या जागावाटप फार्म्युल्याअंतर्गत राजदने ९८, संजदने १०० आणि काँग्रेसने ४० जागा स्वत:कडे ठेवून सपासाठी केवळ पाच जागा सोडल्या होत्या. दरम्यान, या मुद्यावर तोडगा निघेल आणि सपा महाआघाडीत परत येईल, अशी आशा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे.