शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

मुलायम यांच्याकडे जाणार मुख्यमंत्रिपद ?

By admin | Updated: October 24, 2016 10:21 IST

उत्तरप्रदेशात चार मंत्र्यांना हटविल्यानंतर आलेले राजकीय वादळ थोपविण्यासाठी आता पक्ष प्रमुख मुलायम सिंह यादव हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वत: कडे घेऊ शकतात

मीना कमल, लखनौ उत्तरप्रदेशात चार मंत्र्यांना हटविल्यानंतर आलेले राजकीय वादळ थोपविण्यासाठी आता पक्ष प्रमुख मुलायम सिंह यादव हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वत: कडे घेऊ शकतात. शिवपाल सिंह यादव यांच्यासह जुन्या तमाम नेत्यांनी संकटाच्या या काळात नेताजींना (मुलायम सिंह) पुढे येण्याची विनंती केली आहे. सरकार आणि संघटनेबाबत मोठा निर्णय घेण्यापूर्वी मुलायम सिंह यांनी रविवारी दुपारी अचानक आपल्या दोन सुना डिंपल यादव आणि अपर्णा यादव यांच्याशी चर्चा केली. ही पहिली वेळ आहे की, सपातील या गृहयुद्धात दोन्ही सुनांचाही प्रवेश झाला आहे. मुलायम सिंह यादव हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चेनंतर रविवारी त्यांच्या निवासस्थानी शासकीय अधिकाऱ्यांची ये -जा वाढली आहे. तथापि, आपल्या पुढील पाऊलांबाबत मुलायम सिंह यांनी जरी पत्ते उघडले नसले तरी अधिकाऱ्यांची वर्दळ बरेच काही सांगून जाणारी आहे. राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींकडे राजभवनाचे बारीक लक्ष आहे. यात राजभवनाची भूमिका महत्वाची असते. पूर्ण घटनाक्रमावर राज्यपाल राम नाईक लक्ष देऊन आहेत. अमरसिंह घेऊ लागले सल्ला सपातील या राजकीय घडामोडीत अखिलेश यादव यांच्याकडून खलनायकाची उपमा देण्यात आलेले राज्यसभा सदस्य अमर सिंह हे आता कायदेशीर लढाईसाठी सल्ला घेत आहेत. याच दरम्यान, मुलायम सिंह यादव आणि अमर सिंह यांची फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्य सचिव राहुल भटनागर आणि प्रमुख सचिव अनीता सिंह यांना सूचना दिल्या आहेत की, आपल्या परवानगीशिवाय कोणताही आदेश जारी करण्यात येऊ नये. पक्षाच्या अन्य कोणत्याही नेत्याचे आदेश ऐकू नयेत, अशाही सूचना दिल्या आहेत. प्रमुख सचिव अनीता सिंह या मुलायम सिंह यांच्या निकटवर्तीय आहेत, त्यामुळेच हे आदेश देण्यात आले आहेत.मुख्यमंत्र्यांचे बेरजेचे राजकारण मुख्यमंत्रीपदावरुन हटविले जाण्याच्या शक्यतेने अखिलेश यादव यांनी विधिमंडळ दलाच्या बैठकीत आमदारांचे समर्थन मिळविले आहे. जर अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्याचा प्रयत्न झाला तर ते आमदारांचे बहुमत असल्याचा दावा करु शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या बरखास्तीच्या अगोदरच शिवपाल सिंह यादव, माता प्रसाद पांडे, रेवती रमण सिंह, अंबिका चौधरी, बेनी प्रसाद वर्मासह अन्य तमाम जुने नेते मुलायम सिंह यादव यांना भेटले आणि संकटाच्या काळात पुन्हा जबाबदारी स्वत:कडे घेण्याची मागणी केली. बहुतांश जुन्या नेत्यांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंंत्रीपदी ठेवण्यास विरोध केला आहे. या साली शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्याऐवजी खुद्द मुलायमसिंह यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र रामगोपाल यादव यांनी उलट अखिलेश यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी दबाव टाकला होता. तेव्हापासून हा गृहकलह कायम आहे.