शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

अयोध्या, काशीतील मशिदी हलवाव्यात

By admin | Updated: January 13, 2016 04:04 IST

श्रीराम जन्मभूमी हा राष्ट्रीय आस्थेचा मुद्दा आहे. भारतीय समाजावर अनेक शतकांपासून त्याचा प्रभाव कायम आहे. भारतातील मुस्लिम समुदायाने अयोध्या, काशी आणि मथुरा

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीश्रीराम जन्मभूमी हा राष्ट्रीय आस्थेचा मुद्दा आहे. भारतीय समाजावर अनेक शतकांपासून त्याचा प्रभाव कायम आहे. भारतातील मुस्लिम समुदायाने अयोध्या, काशी आणि मथुरा येथील फक्त तीन मशिदी अन्यत्र हलवाव्यात, देशातील उर्वरित ४० हजार मशिदी जिथे आहेत तिथेच राहू द्याव्यात. अन्य मशिदींविषयी हिंदू समुदायाची कोणतीही तक्रार नाही. न्यायालयांच्या निकालांबाबत आजवर मी जी भाकिते केली ती सर्व खरी ठरली आहेत. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल याचीही मला खात्री आहे. वर्षअखेरीला अयोध्येत राम मंदिराची उभारणी हमखास सुरू होईल, असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले. अयोध्येतील राम मंदिर उभारणी या विषयावर अरुंधती वशिष्ठ संशोधन संस्थेतर्फे दिल्ली विद्यापीठाच्या कलादालन सभागृहात दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचा वृत्तांत सादर करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित पत्रपरिषदेत स्वामी बोलत होते. राम मंदिराची उभारणी हा भारतीय जनता पक्षाचा विषय नाही, असे स्पष्ट करीत स्वामी म्हणाले, सारा संघ परिवार एकाच भावनेच्या सूत्रात बांधलेला आहे. आमच्या प्रयत्नांना साहजिकच भाजपची पूर्ण सहानुभूती आहे. निवडणुका जवळ आल्या की, अयोध्येच्या राम मंदिराविषयी विहिंप, संघ परिवार आणि भाजपची आस्था अचानक कशी जागृत होते? याचे उत्तर देताना स्वामी म्हणाले, भारतात दरवर्षीच कोणती ना कोणती निवडणूक असते. पुढल्या वर्षी या विषयाला हात घातला असता तर उत्तर प्रदेशची निवडणूक आहेच.