शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

अयोध्या, काशीतील मशिदी हलवाव्यात

By admin | Updated: January 13, 2016 04:04 IST

श्रीराम जन्मभूमी हा राष्ट्रीय आस्थेचा मुद्दा आहे. भारतीय समाजावर अनेक शतकांपासून त्याचा प्रभाव कायम आहे. भारतातील मुस्लिम समुदायाने अयोध्या, काशी आणि मथुरा

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीश्रीराम जन्मभूमी हा राष्ट्रीय आस्थेचा मुद्दा आहे. भारतीय समाजावर अनेक शतकांपासून त्याचा प्रभाव कायम आहे. भारतातील मुस्लिम समुदायाने अयोध्या, काशी आणि मथुरा येथील फक्त तीन मशिदी अन्यत्र हलवाव्यात, देशातील उर्वरित ४० हजार मशिदी जिथे आहेत तिथेच राहू द्याव्यात. अन्य मशिदींविषयी हिंदू समुदायाची कोणतीही तक्रार नाही. न्यायालयांच्या निकालांबाबत आजवर मी जी भाकिते केली ती सर्व खरी ठरली आहेत. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल याचीही मला खात्री आहे. वर्षअखेरीला अयोध्येत राम मंदिराची उभारणी हमखास सुरू होईल, असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले. अयोध्येतील राम मंदिर उभारणी या विषयावर अरुंधती वशिष्ठ संशोधन संस्थेतर्फे दिल्ली विद्यापीठाच्या कलादालन सभागृहात दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचा वृत्तांत सादर करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित पत्रपरिषदेत स्वामी बोलत होते. राम मंदिराची उभारणी हा भारतीय जनता पक्षाचा विषय नाही, असे स्पष्ट करीत स्वामी म्हणाले, सारा संघ परिवार एकाच भावनेच्या सूत्रात बांधलेला आहे. आमच्या प्रयत्नांना साहजिकच भाजपची पूर्ण सहानुभूती आहे. निवडणुका जवळ आल्या की, अयोध्येच्या राम मंदिराविषयी विहिंप, संघ परिवार आणि भाजपची आस्था अचानक कशी जागृत होते? याचे उत्तर देताना स्वामी म्हणाले, भारतात दरवर्षीच कोणती ना कोणती निवडणूक असते. पुढल्या वर्षी या विषयाला हात घातला असता तर उत्तर प्रदेशची निवडणूक आहेच.