शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कन्हय्याच्या सुटकेसाठी जेएनयूमध्ये आंदोलन

By admin | Updated: February 16, 2016 03:18 IST

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला कन्हय्या लाल याने भारतविरोधी घोषणाबाजी केली होती असा दावा दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ फूटेजच्या आधारे केला

नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला कन्हय्या लाल याने भारतविरोधी घोषणाबाजी केली होती असा दावा दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ फूटेजच्या आधारे केला असला तरी विद्यार्थी नेता कन्हय्या कुमार याची बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी करीत जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार टाकत आंदोलनाचे हत्यार उपसले. प्राध्यापक संघटनांनीही या आंदोलनास नैतिक पाठिंबा दिला.या मुद्द्यावरून दिल्लीतच नव्हे, तर देशभर राजकारण तापले असून, अशा घोषणा देणाऱ्यांना गोळ्या घाला, अशी मागणी भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी केला. दुसरीकडे अमित शहा यांनी ‘हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का?’ या ब्लॉगमधून राहुल गांधींना लक्ष्य केले. राहुल यांनी सद्यस्थितीची तुलना हिटलरकालीन जर्मनीशी केली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, आत्ता नाही तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लादण्यात आलेल्या आणीबाणीदरम्यान देशातील स्थिती हिटलरकालीन जर्मनीशी मिळतीजुळती होती. काँग्रेसच्या डीएनएमध्येच हिटलरसदृश हुकूमशाही आहे. देशातील प्रमुख शैक्षणिक संस्था फुटीरवाद्यांच्या कारवायांचे अड्डे होत असताना सरकारने शांत बसावे, अशी राहुल यांची अपेक्षा आहे का? असे सवाल शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून केले. राहुल गांधी यांनी मात्र आसामच्या सोनितपूर जिल्ह्णात बोलताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली. भाजपा आणि आरएसएस लोकांवर बळजबरीने विचार लादू पाहत आहेत. जेएनयूमधील ताज्या घटनेतून हेच सिद्ध झाले आहे, असे राहुल म्हणाले. देशातील सांस्कृतिक विविधता आणि लोकभावनांशी भाजपा व आरएसएसला कुठलेही सोयरसूतक नाही. सर्वांनी केवळ आमच्या विचारांचे अनुकरण करावे, असे त्यांना वाटते. शैक्षणिक संस्थांमध्येही त्यांना दहशतवाद दिसू लागला आहे. त्यांच्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांना दहशतवादी ठरविण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. गत अनेक वर्षांपासून मुस्लिमांना अतिरेकी ठरवून हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचेचे भाजपा व संघाचे प्रयत्न राहिल, असा आरोप त्यांनी केला.शिवसेनेने जेएनयू प्रकरणात विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशद्रोह्णांचे समर्थन करण्यासाठी लोकप्रतिनिधीच पुढे येत असतील तर त्यांचे पद रद्द करण्याची तरतूद कायद्यात करायला हवी, अशी भूमिका शिवसेनेने सामना या मृखपत्रात मांडली.