शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

राममंदिरासाठी अयोध्येत हालचाली

By admin | Updated: June 21, 2017 01:38 IST

उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने

अयोध्या : उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधकामासाठी रामनाम कोरलेले दगड (रामशिला) आणून त्यांचा साठा करण्यास पुन्हा सरुवात केली आहे.बाबरी मशिद- रामजन्मभूमीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम वर्षभरात सुरु केले जाईल, असे विहिंपने याआधीच जाहीर केले आहे. विहिंपचे ज्येष्ठ नेते त्रिलोकी नाथ पांडे यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामासाठी एक हजाराहून जास्त ट्रक भरून रामशिला लागणार आहेत. त्यापैकी पहिले दोन ट्रक राजस्थानमधून भरतपूर येथून सोमवारी येथे पोहोचले. त्या ट्रकमधून आणलेल्या रामशिला कारसेवकपूरम येथे उतरवून घेण्यात आल्या. बाकीच्या रामशिलांचे ट्रकही येत्या काही दिवसांत येतील व मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल, असेही पांडे म्हणाले.सन २०१५ मध्येही विहिंपने देशभरातून अशा रामशिला आणण्याचा प्रयत्न केला होता. पण पहिले दोन ट्रक आल्यावर समाजवादी पक्षाच्या राज्य सरकारने अशा वाहतुकीसाठी लागणारे ‘फॉर्म ३९’ देणे बंद केले व रामशिलांची जमवाजमव तेवढ्यावरच थांबवली होती. पांडे म्हणाले की, महिनाभरापूर्वी आम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटलो व त्याने लगेच ‘फॉर्म ३९’ देण्याचे आदेश काढले. (वृत्तसंस्था)राममंदिर बांधण्यावर आपण ठाम आहोत, याचा संदेश देण्यासाठी भगव्या संघटनांची ही दगडांची जमवाजमव सुरू आहे. पण त्याने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही. राज्यघटनेनुसार न्याय होईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.- खलिक अहमद, सुप्रीम कोर्टातील पक्षकारप्रकरण न्याप्रविष्ट असूनही असे करणे बेकायदाच नव्हे तर देशविरोधीही आहे. यामुळे सांप्रदायिक तणाव वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल.- रूपरेखा वर्मा, माजी कुलगुरु, लखनऊ विद्यापीठ