शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

राममंदिरासाठी अयोध्येत हालचाली

By admin | Updated: June 21, 2017 01:38 IST

उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने

अयोध्या : उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधकामासाठी रामनाम कोरलेले दगड (रामशिला) आणून त्यांचा साठा करण्यास पुन्हा सरुवात केली आहे.बाबरी मशिद- रामजन्मभूमीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम वर्षभरात सुरु केले जाईल, असे विहिंपने याआधीच जाहीर केले आहे. विहिंपचे ज्येष्ठ नेते त्रिलोकी नाथ पांडे यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामासाठी एक हजाराहून जास्त ट्रक भरून रामशिला लागणार आहेत. त्यापैकी पहिले दोन ट्रक राजस्थानमधून भरतपूर येथून सोमवारी येथे पोहोचले. त्या ट्रकमधून आणलेल्या रामशिला कारसेवकपूरम येथे उतरवून घेण्यात आल्या. बाकीच्या रामशिलांचे ट्रकही येत्या काही दिवसांत येतील व मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल, असेही पांडे म्हणाले.सन २०१५ मध्येही विहिंपने देशभरातून अशा रामशिला आणण्याचा प्रयत्न केला होता. पण पहिले दोन ट्रक आल्यावर समाजवादी पक्षाच्या राज्य सरकारने अशा वाहतुकीसाठी लागणारे ‘फॉर्म ३९’ देणे बंद केले व रामशिलांची जमवाजमव तेवढ्यावरच थांबवली होती. पांडे म्हणाले की, महिनाभरापूर्वी आम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटलो व त्याने लगेच ‘फॉर्म ३९’ देण्याचे आदेश काढले. (वृत्तसंस्था)राममंदिर बांधण्यावर आपण ठाम आहोत, याचा संदेश देण्यासाठी भगव्या संघटनांची ही दगडांची जमवाजमव सुरू आहे. पण त्याने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही. राज्यघटनेनुसार न्याय होईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.- खलिक अहमद, सुप्रीम कोर्टातील पक्षकारप्रकरण न्याप्रविष्ट असूनही असे करणे बेकायदाच नव्हे तर देशविरोधीही आहे. यामुळे सांप्रदायिक तणाव वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल.- रूपरेखा वर्मा, माजी कुलगुरु, लखनऊ विद्यापीठ