शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मदर्स डे : 35 टक्के महिलांना नकोय दुसरे अपत्य

By admin | Updated: May 14, 2017 08:38 IST

बदलत्या जीवनशैलीनुसार आपले विचारही बदलत आहेत. कुटुंब नियोजनाला आधी भारतात जास्त महत्व दिलं जात नव्हतं तर आज कुटुंब नियोजनाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बदलत्या जीवनशैलीनुसार आपले विचारही बदलत आहेत. कुटुंब नियोजनाला आधी भारतात जास्त महत्व दिलं जात नव्हतं तर आज कुटुंब नियोजनाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं. "मदर्स डे"निमित्त असोचेमच्या सामाजिक विभागाने देशभरातील महत्वाच्या दहा शहरातून महिलांचे सर्वेक्षण केले. 
 
या सर्वेक्षणानुसार भारतातील शहरी भागात काम करणाऱ्या 35 टक्के काम करणाऱ्या महिलांना दुसरं मुल नकोय. कामासोबत इतर व्यापामुळे  दुसऱ्या मुलासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.  तर  काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून दुसरे अपत्य नको आहे.   
 
अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील जवळपास 1500 महिलांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव, मुलांच्या संगोपनासाठीचा खर्च ही एकाच अपत्यावर थांबण्यामागची मुख्य कारणे असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नसल्याचे म्हटले. 
 
काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसऱ्या मुलाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
हल्ली मोठ्या शहरांमध्ये छोटे कुटुंब असल्याने तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर असलेली आई आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, हे प्रमाण शहरांत खूप आहे.