शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

मदर टेरेसांनी धर्मांतरात कधीही भाग घेतला नाही!

By admin | Updated: February 24, 2015 23:31 IST

मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.

कोलकाता/नवी दिल्ली : मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.मदर टेरेसा या मिशनरीज आॅफ चॅरिटीत असताना धर्मांतर घडवून आणले जात नव्हते आणि आतादेखील धर्मांतर घडवून आणले जात नाही. केवळ गोरगरिबांची सेवा करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे व त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणे हाच आमचा एकमेव उद्देश असतो,’ असे मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी म्हटले आहे. टेरेसा यांनी १९५० साली मिशनरीज आॅफ चॅरिटीची स्थापना केली होती. ‘मदर टेरेसा यांचे कार्य चांगले होते; परंतु त्यांनी केवळ लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठीच त्यांची सेवा केली,’ असे वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले होते. मदर टेरेसांनी धर्मांतरासाठी गरिबांची सेवा केली असा विचार करणेच मूर्खपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया ब्लेस्ड व्हर्जिन मेरीच्या सिस्टर एस.एम. सिरील यांनी व्यक्त केली. टेरेसा यांनी धर्मांतर घडविले असे म्हणणे चुकीचे आहे. लोक ख्रिश्चन बनतील या हेतूने त्यांनी लोकांची सेवा केली नाही, असे सिरील यांनी म्हटले.वक्तव्याचे लेखींकडून समर्थनलोकांना ख्रिश्चन धर्माच्या चौकटीत सामील करून घेणे हेच आपले काम असल्याचे प्रत्यक्ष मदर टेरेसा यांनी मुलाखतीत सांगितले होते, असा दावा करून भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)