शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मदर टेरेसांनी धर्मांतरात कधीही भाग घेतला नाही!

By admin | Updated: February 24, 2015 23:31 IST

मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.

कोलकाता/नवी दिल्ली : मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.मदर टेरेसा या मिशनरीज आॅफ चॅरिटीत असताना धर्मांतर घडवून आणले जात नव्हते आणि आतादेखील धर्मांतर घडवून आणले जात नाही. केवळ गोरगरिबांची सेवा करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे व त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणे हाच आमचा एकमेव उद्देश असतो,’ असे मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी म्हटले आहे. टेरेसा यांनी १९५० साली मिशनरीज आॅफ चॅरिटीची स्थापना केली होती. ‘मदर टेरेसा यांचे कार्य चांगले होते; परंतु त्यांनी केवळ लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठीच त्यांची सेवा केली,’ असे वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले होते. मदर टेरेसांनी धर्मांतरासाठी गरिबांची सेवा केली असा विचार करणेच मूर्खपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया ब्लेस्ड व्हर्जिन मेरीच्या सिस्टर एस.एम. सिरील यांनी व्यक्त केली. टेरेसा यांनी धर्मांतर घडविले असे म्हणणे चुकीचे आहे. लोक ख्रिश्चन बनतील या हेतूने त्यांनी लोकांची सेवा केली नाही, असे सिरील यांनी म्हटले.वक्तव्याचे लेखींकडून समर्थनलोकांना ख्रिश्चन धर्माच्या चौकटीत सामील करून घेणे हेच आपले काम असल्याचे प्रत्यक्ष मदर टेरेसा यांनी मुलाखतीत सांगितले होते, असा दावा करून भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)