शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

बहुतेक प्रभागांमध्ये २ किंवा ३ मतदानयंत्रे शक्य

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये २ किंवा ३ मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन) असू शकतील. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी ...



पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये २ किंवा ३ मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन) असू शकतील. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी लागणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २ उमेदवारांना मते द्यावयाची होती. आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारास ४ उमेदवारांना मते द्यावयाची आहेत. मतदानयंत्रांची रचनाच अशी असेल की प्रत्येक मतदाराला ४ मते द्यावीच लागतील. प्रत्येक मत नोंदणीनंतर मत पूर्ण झाल्याचा विशिष्ट संकेतध्वनी यंत्रातून येतो. एक मत दिल्याशिवाय दुस-या मतासाठी यंत्राची सज्जता होऊ शकत नाही. प्रत्येक मत दिल्यानंतरच कंट्रोल बॉक्स ओपन होऊन दुसरे मत किंवा कोणालाही मत नाही (नोटा)नोंदणी होईल. त्यानंतरच एका मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.
त्यामुळे एका मतदाराला चारही मते नोंदवावीच लागतील. मतदाराला अपेक्षित असलेली २ किंवा ३ मते देऊन तो यंत्रापासून दूर जाऊ शकणार नाही. एखाद्या नापसंत उमेदवारऐवजी त्याला कोणालाही मत नाही (नोटा)हा पर्याय अवलंबिता येणे शक्य आहे.
मतदार याद्या अद्ययावत असल्यास, मतदान कसे करावे याबाबत निवडणूक यंत्रणेने प्रबोधन केलेले असल्यास एका मतदाराला मत नोंदविण्यासाठी ४० ते ५० सेकंद पुरेसे असून मतदान झाल्यानंतर बोटाला खुणेची शाई लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेस सुमारे १ मिनिटांचा अवधी लागेल.
आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे या पक्षांशिवाय अन्य काही पक्ष व अपक्ष यांची भाऊगर्दी बहुसंख्य प्रभागांमध्ये असणार आहे. राजकीय पक्षांचे २० व अन्य असे मिळून २४ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असू शकतील.
एका इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिनमध्ये एकावेळी १२ उमेदवारांची मते नोंदविण्याची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक मते एका यंत्रावर नोंदवायची झाल्यास त्याप्रकारचे तंत्र राज्य शासनाच्या निवडणूक शाखेला अवलंबावे लागणार आहे. साधारणत: एका मतदान केंद्रावर २ किंवा ३ यंत्रे असण्याची दाट शक्यता आहे.
एखाद्या मतदाराने ४ ऐवजी कमी मते दिली तर त्याला सर्व मते देण्याबाबत किंवा नोटाचा वापर करण्याबाबत निवडणूक अधिका-यांना सुचना द्याव्या लागण्याची शक्यता असून त्यामुळे मतदानाचा वेळ वाढू शकेल. अन्य निवडणुकांच्या तुलनेत नगरपरिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या अधिक असते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीने क्लिष्टता वाढणार असून मतमोजणीसाठी लागणारा वेळही वाढणार आहे.
निवडणूक यंत्रणेत काम करण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या एका जाणकाराने सांगितले की ४ उमेदवारांच्या प्रभागामुळे मतदान यंत्रणेपुढचे काम वाढू शकेल. या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे याबाबत निवडणूक शाखेने आतापासूनच मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.