शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सरसकट दारूबंदीमुळे प्रश्न कदापि सुटणार नाहीत

By admin | Updated: February 1, 2015 01:21 IST

सरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.

सुरेश गुदले ल्ल पणजीसरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. हिवरेबाजार (जि. अहमदनगर) येथील जलसंवर्धनाच्या कामामुळे देशभर परिचित झालेले पवार येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. गोवा आणि दारूच्या समीकरणाविषयी जगभर एक प्रतिमा तयार झाली आहे. गोवा म्हणजे मौजमजा, असेही म्हटले जाते. पोपटराव पवार यांनी व्यसनमुक्तीसाठीही काम केलेले असल्याने त्यांना दारूबंदी विषयावर बोलते केले. तेव्हा युरोपीयन देशांत सर्व कुटुंबीय एकत्र बसून दारू पितात. मात्र युरोप व भारतात मोठे सांस्कृतिक अंतर आहे. आनंद झाला म्हणून दारू प्यायची, मग नोकरी मिळाली यासारखी कारणेही पुरेशी ठरतात. दु:ख झाले म्हणून दारू पिली जाते. दोन्हीही बाबी अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’ वाढल्यानेही लोक व्यसनांच्या आहारी जातात, असे ते म्हणाले. शालेय स्तरावर व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. हिवरेबाजार येथे आम्ही अशा प्रकारे प्रबोधन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधन करणे हाच व्यसनमुक्तीवर योग्य व शाश्वत पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की शालेय मुलांना, तरुणांना काही वर्षांपूर्वी व्यायामशाळा, क्रीडांगणे, मनोरंजनाची सशक्त साधने यांसारखे अनेक पर्याय होते. त्यामुळे अन्य क्षेत्रांमध्ये तरुणाई गुंतली जात होती. मात्र आता शहरांतील चित्र बदलले आहे. अनेक औषधांमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो़ त्यामुळे पूर्ण दारूबंदीपेक्षा नियंत्रण महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाते. प्रबोधन हाच त्यावर उपाय आहे. - पोपटराव पवार, सामाजिक कार्यकर्ते