शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांचे मृत्यू सर्वाधिक

By admin | Updated: March 22, 2017 00:49 IST

कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले.

नवी दिल्ली : कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना वरील कबुली दिली.महाराष्ट्रात कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण (पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू) काहीसे जास्त आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३५ जणांचा कोठडीत मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये २१, तर २०१५ मध्ये १९ जण कोठडीत दगावले होते. हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. कोठडीतील मृत्यूंना जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत, असे रिजिजू म्हणाले.मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त आणि भाजपा सदस्य सत्यपाल सिंह यांनी रिजिजू यांची आकडेवारी खोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस देशात सर्वश्रेष्ठ पोलीस दल आहे, असे ते म्हणाले, तेव्हा काही सदस्यांना हसू फुटले. त्यावर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ‘आम्हाला तुमचीही (सत्यपालसिंह) आकडेवारी पाहावी लागेल,’ असे गमतीने म्हटले. तेव्हा सभागृहात पुन्हा हास्याची लकेर पसरली.मृत्यूची कारणे इतरही?-पोलिसांच्या ताब्यात झालेल्या कैद्यांच्या सर्व मृत्यूंना कोठडीतील मृत्यू म्हटले जात नाही. कारण यातील काही मृत्यू न्यायालयीन कोठडीत किंवा नैसर्गिक कारण अथवा आजारपणामुळे झालेले असतात, असे सत्यपाल सिंह यांचे म्हणणे होते. माजी केंद्रीय गृहसचिव व खा. आर. के. सिंह आणि झारखंड पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक व खा. व्ही. डी. राम हे मात्र, सत्यपालसिंह यांच्या मताशी सहमत नव्हते. ते काही बोलू इच्छित होते. मात्र, अध्यक्षांनी त्यांना मुभा दिली नाही. दोन्ही भाजपाचे सदस्य आहेत.