शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

महाराष्ट्रामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांचे मृत्यू सर्वाधिक

By admin | Updated: March 22, 2017 00:49 IST

कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले.

नवी दिल्ली : कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना वरील कबुली दिली.महाराष्ट्रात कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण (पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू) काहीसे जास्त आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३५ जणांचा कोठडीत मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये २१, तर २०१५ मध्ये १९ जण कोठडीत दगावले होते. हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. कोठडीतील मृत्यूंना जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत, असे रिजिजू म्हणाले.मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त आणि भाजपा सदस्य सत्यपाल सिंह यांनी रिजिजू यांची आकडेवारी खोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस देशात सर्वश्रेष्ठ पोलीस दल आहे, असे ते म्हणाले, तेव्हा काही सदस्यांना हसू फुटले. त्यावर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ‘आम्हाला तुमचीही (सत्यपालसिंह) आकडेवारी पाहावी लागेल,’ असे गमतीने म्हटले. तेव्हा सभागृहात पुन्हा हास्याची लकेर पसरली.मृत्यूची कारणे इतरही?-पोलिसांच्या ताब्यात झालेल्या कैद्यांच्या सर्व मृत्यूंना कोठडीतील मृत्यू म्हटले जात नाही. कारण यातील काही मृत्यू न्यायालयीन कोठडीत किंवा नैसर्गिक कारण अथवा आजारपणामुळे झालेले असतात, असे सत्यपाल सिंह यांचे म्हणणे होते. माजी केंद्रीय गृहसचिव व खा. आर. के. सिंह आणि झारखंड पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक व खा. व्ही. डी. राम हे मात्र, सत्यपालसिंह यांच्या मताशी सहमत नव्हते. ते काही बोलू इच्छित होते. मात्र, अध्यक्षांनी त्यांना मुभा दिली नाही. दोन्ही भाजपाचे सदस्य आहेत.