शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस

By admin | Updated: May 10, 2017 03:04 IST

अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला.हवामान खात्याने गेल्या १८ एप्रिल रोजी नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असे म्हटले होते. गेल्या ५० वर्षांतील पावसाची सरासरी ८९ सेंमी गृहीत धरून त्याच्या तुलनेत पावसाचा कमी, जास्त किंवा सरासरीएवढा असा अंदाज वर्तविण्याची पद्धत आहे. यातही वर्तविलेल्या अंदाजाहून ५ टक्के कमी-जास्त पाऊस होण्याची शक्यता असते.भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मार्चपर्यंतच्या परिस्थितीनुसार १८ एप्रिलचा अंदाज वर्तवला होता. तेव्हापासून परिस्थिती अनुकूल झाल्याने सरासरीहून थोडा जास्त पाऊसही पडू शकतो.भारतात जून ते सप्टेंबर हा नैर्ऋत्य मान्सूनचा हंगाम असतो. वर्षभरातील ७० टक्के पाऊस या काळात पडत असल्याने शेतीचे गणित प्रामुख्याने या पावसावर ठरते. म्हणूनच चांगला पाऊस हा शेतीसाठी शुभवार्ता ठरतो. शेतीचे मुबलक उत्पादन हे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरते. म्हणूच केवळ शेतकरीच नव्हे तर देशाचे शासक आणि अर्थतज्ज्ञही पावसाइतकेच पावसाच्या अंदाजाकडे डोळे लावून बसलेले असतात.