शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

भारतात पाच वर्षाखालील अर्ध्याहून जास्त मुलं कुपोषित

By admin | Updated: March 6, 2017 14:37 IST

भारतामध्ये पाच वर्षांहून कमी वय असलेली अर्ध्यांहून जास्त मुलं अशक्त (अॅनीमिक) असल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतामध्ये पाच वर्षांहून कमी वय असलेली अर्ध्यांहून जास्त मुलं अशक्त (अॅनीमिक) असल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. या सर्व मुलांमध्ये रक्ताची कमतरता, थकवा, सारखं आजारी पडणे अशी लक्षणं दिसत असून या सर्वांचा मेंदूच्या विकासावर परिणाम होत आहे. 
 
2015-16 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सहा लाख कुटुबांमधील एकाच वयोगटातील 38 टक्के मुलांची उंची कमी होती. 36 टक्के मुलांचं वजन जास्त, तर 21 टक्के मुलं अशक्त आढळली. 
 
2011मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे 2015 मध्ये भारतात पाच वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांची संख्या एकूण 12.4 कोटी असल्याचा अंदाज आहे. यामधील 7.2 कोटी मुलं अॅनीमिक, 5 कोटी मुलं कमी उंची, 2.6 कोटी मुलं अशक्त आणि 4.4 कोटी मुलांचं वजन कमी असल्याचं समोर आलं होतं. 2005-06 मधील आकड्यांशी तुलना करता परिस्थिती खूपच वेगळी आहे.
 
ही आकडेवारी अशक्त सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आरसा आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. सर्व्हेक्षणातून असंही लक्षात येतं की अनेक गरोदर महिला स्वत:  अॅनीमिक असल्याने त्याचा सरळ परिणाम त्यांच्या होणा-या मुलांवर पडतो. सर्व्हेक्षणानुसार 25 ते 49 वयोगटाकील 53 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष अॅनीमिक होते. 
 
बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान आणि छत्तीसगडमधील आकडेवारी सर्वात जास्त असून हरियाणा, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमधील हा आकडा कमी असला तरी समाधानकारक नाही. तामिळनाडूत 51 टक्के मुलं अशक्त आणि कुपोषित असून केरळमध्ये प्रत्येक तीन मुलांमागे एका मुलाला हा आजार आहे.