शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ग्राहकांना अधिक सवलती

By admin | Updated: April 26, 2015 01:43 IST

स्पेक्ट्रमची ‘मल्टी डायमेंशनेलिटी’ वाढविल्यामुळे दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारून ग्राहकांना आणखी सवलती आणि उत्तम सेवा मिळतील,

नवी दिल्ली : स्पेक्ट्रमची ‘मल्टी डायमेंशनेलिटी’ वाढविल्यामुळे दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारून ग्राहकांना आणखी सवलती आणि उत्तम सेवा मिळतील, असे आश्वासन पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत दिले. कॉल ड्रॉप होण्याविषयी मोबाईल कंपन्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारने मोबाईल फोन एअरवेव्हचा लिलाव केला आहे, त्यातून सरकारला मोठा फायदा झाला आहे; पण सरकार मोबाईलधारकांच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून कंपन्यांना निर्देश देणार आहे का, असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांना विचारला. त्यांच्या अनुपस्थितीत पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी उत्तर दिले. प्रधान म्हणाले, या लिलावातून सरकारला सध्या ३२ हजार कोटी रूपये मिळाले. पुढील दहा वर्षांत १ लाख ८३ हजार कोटी रूपये एकूण महसूल प्राप्त होईल. सरकारने जनतेचेच हित लक्षात ठेवून हा व्यवहार केला आहे. त्यामुळे सध्या ज्या समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागतो, त्यात दर्जात्मक सुधारणा होतील. दूरसंचाराची नवी पध्दत बदलत आहे. भारतातील सर्वांना डिजिटल इंडियाशी जोडले जाईल. मोबाईलचे दर ‘ट्राय’ निश्चित करत असते. दर वाढणार नाहीत, उलट नव्यातंत्रामुळे कमी होण्याचीच शक्यता अधिक आहे. (विशेष प्रतिनिधी)1 याच विषयाला पूरक प्रश्न राज्यसभा सदस्य व लोकमत मीडिया लिमिटेडच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारला होता. सरकारकडे कोट्यवधी रूपये गोळा झाले पण कॉल ड्रॉपच्या समस्या वाढल्याचे दिसून येते. एका कॉलमध्ये अनेक कॉल होत आहेत. अ‍ॅड- आॅन - सर्व्हिसच्या नावाखाली ३० रूपये तर कधी ५० रूपयांचे वाढीव देयक पाठविले जाते. या दंडामुळे अकारण ग्राहक भरडला जातो. हे शोषण कधी थांबेल, सरकारकडे काही व्यवस्था आहे का, या दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात प्रधान म्हणाले, या समस्यांचे निराकरण सरकार करत आहे. एकाधिकार होऊ नये याची काळÞजी ‘ट्राय’ घेत आहे. सरकार व कंपन्याही त्या निर्णयात बांधील आहेत. 2 हा सारा प्रकार टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. पूर्वी २१०० ते ८०० अशा मेगाहर्टचा लिलाव वेगवेगळा झाला आहे. यावेळÞी पध्दत बदलण्याने ग्राहक त्रस्त होणार नाहीत, यासाठी कंपन्याही नवीन तंत्र विकसित करत आहेत. मंत्र्याच्या याच उत्तरावर खा. अजय संचेती यांनी कंपन्या ग्राहकांसाठी मूलभूत सोयी वाढविणार का, असा पूरक प्रश्न विचारला होता. नवीन तंत्र विकसित करण्याच्या सूचना गुंतवणूकदार व कंपन्यांना दिल्या आहेत, असे प्रधान म्हणाले.