शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १३ शहरे स्मार्ट

By admin | Updated: May 25, 2016 01:34 IST

स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत.

नवी दिल्ली : स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत. अन्य दोन शहरे काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश आणि मणिपूरमधील आहेत. जलद गती स्पर्धेत भाग घेतलेल्या एकूण २३ शहरांतून या तेरा शहरांची निवड करण्यात आली आहे.केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या शहरांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले की, जलदगती स्पर्धेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १३ शहरांनी एकूण ३०,२२९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे ३३ शहरांत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित गुंतवणुकीचा आकडा ८०,७८९ कोटी रुपयांवर गेला आहे. जानेवारी २०१६ पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीसाठी २० शहरांची निवड करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली आहे. जलद गती स्पर्धेत एकूण २३ शहरांनी भाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, त्या राज्यांतील ही शहरे आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांच्या स्पर्धेत ज्या सात राजधानी शहरांचा समावेश केला गेला नव्हता, ती शहरे आता पुढच्या टप्प्यात अन्य शहरांसोबत स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, अशी माहितीही नायडू यांनी दिली. राजधानीच्या शहरांत पाटणा (बिहार), शिमला (हिमाचल ), नवीन रायपूर (छत्तीसगड), इटानगर (अरुणाचल प्रदेश), अमरावती (आंध्र), बंगळुरू आणि तिरुवअनंतपुरमचा (केरळ) समावेश आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशभरात १०० शहरे २०१९-२० पर्यंत स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठ केंद्र सरकार पुढील पाच वर्षात ४८ हजार कोटी रुपयांचे आर्थिक साह्य करणार करणार आहे. स्पर्धेअंती निवड करण्यात आलेल्या शहराला पहिल्या वर्षी २०० कोटी रुपये, त्यानंतर तीन वर्षात प्रत्येकी १०० कोटी रुपये केंद्रीय मदत दिली जाणार आहे.ही आहेत तेरा शहरे... लखनौ (उत्तर प्रदेश), चंदिगड (केंद्रशासित प्रदेश), रायपूर (छत्तीसगढ), न्यू टाऊन कोलकाता (पश्चिम बंगाल), भागलपूर (बिहार), पणजी (गोवा), पोर्ट आॅफ ब्लेअर (अंदमान-निकोबार), इम्फाळ (मणिपूर), धर्मशाळा (हिमाचल प्रदेश), रांची (झारखंड), वरंगल (तेलंगण), आगरतळा (त्रिपुरा) आणि फरीदाबाद (हरियाणा). नापास ठरलेली शहरे... दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत अयशस्वी ठरलेली ही आहेत दहा शहरे... पासीघाट (अरुणाचल), शिलाँग (मेघालय), नामची (सिक्कीम), दीव (दमण-दीव), औलगरेट (पुडुच्चेरी) कवरत्ती (लक्षद्वीप) आणि डेहराडून (उत्तराखंड)