शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आणखी १३ शहरे स्मार्ट

By admin | Updated: May 25, 2016 01:34 IST

स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत.

नवी दिल्ली : स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत. अन्य दोन शहरे काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश आणि मणिपूरमधील आहेत. जलद गती स्पर्धेत भाग घेतलेल्या एकूण २३ शहरांतून या तेरा शहरांची निवड करण्यात आली आहे.केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या शहरांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले की, जलदगती स्पर्धेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १३ शहरांनी एकूण ३०,२२९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे ३३ शहरांत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित गुंतवणुकीचा आकडा ८०,७८९ कोटी रुपयांवर गेला आहे. जानेवारी २०१६ पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीसाठी २० शहरांची निवड करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली आहे. जलद गती स्पर्धेत एकूण २३ शहरांनी भाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, त्या राज्यांतील ही शहरे आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांच्या स्पर्धेत ज्या सात राजधानी शहरांचा समावेश केला गेला नव्हता, ती शहरे आता पुढच्या टप्प्यात अन्य शहरांसोबत स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, अशी माहितीही नायडू यांनी दिली. राजधानीच्या शहरांत पाटणा (बिहार), शिमला (हिमाचल ), नवीन रायपूर (छत्तीसगड), इटानगर (अरुणाचल प्रदेश), अमरावती (आंध्र), बंगळुरू आणि तिरुवअनंतपुरमचा (केरळ) समावेश आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशभरात १०० शहरे २०१९-२० पर्यंत स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठ केंद्र सरकार पुढील पाच वर्षात ४८ हजार कोटी रुपयांचे आर्थिक साह्य करणार करणार आहे. स्पर्धेअंती निवड करण्यात आलेल्या शहराला पहिल्या वर्षी २०० कोटी रुपये, त्यानंतर तीन वर्षात प्रत्येकी १०० कोटी रुपये केंद्रीय मदत दिली जाणार आहे.ही आहेत तेरा शहरे... लखनौ (उत्तर प्रदेश), चंदिगड (केंद्रशासित प्रदेश), रायपूर (छत्तीसगढ), न्यू टाऊन कोलकाता (पश्चिम बंगाल), भागलपूर (बिहार), पणजी (गोवा), पोर्ट आॅफ ब्लेअर (अंदमान-निकोबार), इम्फाळ (मणिपूर), धर्मशाळा (हिमाचल प्रदेश), रांची (झारखंड), वरंगल (तेलंगण), आगरतळा (त्रिपुरा) आणि फरीदाबाद (हरियाणा). नापास ठरलेली शहरे... दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत अयशस्वी ठरलेली ही आहेत दहा शहरे... पासीघाट (अरुणाचल), शिलाँग (मेघालय), नामची (सिक्कीम), दीव (दमण-दीव), औलगरेट (पुडुच्चेरी) कवरत्ती (लक्षद्वीप) आणि डेहराडून (उत्तराखंड)