शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

आणखी १३ शहरे स्मार्ट

By admin | Updated: May 25, 2016 01:34 IST

स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत.

नवी दिल्ली : स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली असून चार शहरे भाजपाशासित छत्तीसगढ, गोवा, झारखंड आणि हरियाणा राज्यातील आहेत. अन्य दोन शहरे काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश आणि मणिपूरमधील आहेत. जलद गती स्पर्धेत भाग घेतलेल्या एकूण २३ शहरांतून या तेरा शहरांची निवड करण्यात आली आहे.केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या शहरांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले की, जलदगती स्पर्धेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १३ शहरांनी एकूण ३०,२२९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे ३३ शहरांत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित गुंतवणुकीचा आकडा ८०,७८९ कोटी रुपयांवर गेला आहे. जानेवारी २०१६ पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीसाठी २० शहरांची निवड करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात आणखी १३ शहरांची निवड करण्यात आली आहे. जलद गती स्पर्धेत एकूण २३ शहरांनी भाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, त्या राज्यांतील ही शहरे आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांच्या स्पर्धेत ज्या सात राजधानी शहरांचा समावेश केला गेला नव्हता, ती शहरे आता पुढच्या टप्प्यात अन्य शहरांसोबत स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, अशी माहितीही नायडू यांनी दिली. राजधानीच्या शहरांत पाटणा (बिहार), शिमला (हिमाचल ), नवीन रायपूर (छत्तीसगड), इटानगर (अरुणाचल प्रदेश), अमरावती (आंध्र), बंगळुरू आणि तिरुवअनंतपुरमचा (केरळ) समावेश आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशभरात १०० शहरे २०१९-२० पर्यंत स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठ केंद्र सरकार पुढील पाच वर्षात ४८ हजार कोटी रुपयांचे आर्थिक साह्य करणार करणार आहे. स्पर्धेअंती निवड करण्यात आलेल्या शहराला पहिल्या वर्षी २०० कोटी रुपये, त्यानंतर तीन वर्षात प्रत्येकी १०० कोटी रुपये केंद्रीय मदत दिली जाणार आहे.ही आहेत तेरा शहरे... लखनौ (उत्तर प्रदेश), चंदिगड (केंद्रशासित प्रदेश), रायपूर (छत्तीसगढ), न्यू टाऊन कोलकाता (पश्चिम बंगाल), भागलपूर (बिहार), पणजी (गोवा), पोर्ट आॅफ ब्लेअर (अंदमान-निकोबार), इम्फाळ (मणिपूर), धर्मशाळा (हिमाचल प्रदेश), रांची (झारखंड), वरंगल (तेलंगण), आगरतळा (त्रिपुरा) आणि फरीदाबाद (हरियाणा). नापास ठरलेली शहरे... दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत अयशस्वी ठरलेली ही आहेत दहा शहरे... पासीघाट (अरुणाचल), शिलाँग (मेघालय), नामची (सिक्कीम), दीव (दमण-दीव), औलगरेट (पुडुच्चेरी) कवरत्ती (लक्षद्वीप) आणि डेहराडून (उत्तराखंड)