शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

मान्सून केरळमध्ये !

By admin | Updated: June 9, 2016 06:22 IST

दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली

तिरुवनंतपुरम : दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली आहे. या राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे देशभरात पावसाळ्याची सुरुवात झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्याने केरळमध्ये एकाला जीव गमावावा लागला.केरळ आणि लक्षद्वीपमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाच्या तिरुवनंतपुरम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. संतोष यांनी केली आहे. मंगळवारच्या रात्रीपासून केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागासह मालदीव,केरळ, तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या तसेच मध्यमभागाकडे आगेकूच चालविली असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यापूर्वी आयएमडीने ९ जून ही मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली होती. प्रत्यक्षात ८ जून रोजी मान्सूनसंबंधी तीनही परिमाणांची पूर्तता झाली. त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे बुधवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा अधिकृतरीत्या करण्यात आली. (वृत्तसंस्था)>सोमवारी राज्यामध्ये...सध्याची अनुकूल परिस्थिती पाहता मान्सून येत्या ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रात धडकेल, अशी आनंदाची बातमी पुणे वेधशाळेच्या संचालक सुनीतादेवी यांनी दिली. केरळनंतर आता पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, केरळ व तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि दक्षिण आंध्रप्रदेशात सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती आहे़ त्यानंतर दोन-तीन दिवसांत तो राज्यभरात बरसू लागेल, असे सध्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर येथे ९, रत्नागिरी ८, पणजी २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ साताऱ्यातही दमदार सरी कोसळल्या असून महाबळेश्वर चिंब भिजून गेले.