शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून केरळमध्ये !

By admin | Updated: June 9, 2016 06:22 IST

दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली

तिरुवनंतपुरम : दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली आहे. या राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे देशभरात पावसाळ्याची सुरुवात झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्याने केरळमध्ये एकाला जीव गमावावा लागला.केरळ आणि लक्षद्वीपमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाच्या तिरुवनंतपुरम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. संतोष यांनी केली आहे. मंगळवारच्या रात्रीपासून केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागासह मालदीव,केरळ, तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या तसेच मध्यमभागाकडे आगेकूच चालविली असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यापूर्वी आयएमडीने ९ जून ही मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली होती. प्रत्यक्षात ८ जून रोजी मान्सूनसंबंधी तीनही परिमाणांची पूर्तता झाली. त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे बुधवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा अधिकृतरीत्या करण्यात आली. (वृत्तसंस्था)>सोमवारी राज्यामध्ये...सध्याची अनुकूल परिस्थिती पाहता मान्सून येत्या ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रात धडकेल, अशी आनंदाची बातमी पुणे वेधशाळेच्या संचालक सुनीतादेवी यांनी दिली. केरळनंतर आता पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, केरळ व तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि दक्षिण आंध्रप्रदेशात सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती आहे़ त्यानंतर दोन-तीन दिवसांत तो राज्यभरात बरसू लागेल, असे सध्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर येथे ९, रत्नागिरी ८, पणजी २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ साताऱ्यातही दमदार सरी कोसळल्या असून महाबळेश्वर चिंब भिजून गेले.