शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मान्सून १ जूनला!

By admin | Updated: May 11, 2015 03:29 IST

मान्सून वेळीच म्हणजे १ जूनला केरळला धडक देणार असल्याची खूशखबर आहे; मात्र पाऊस कमी राहणार असल्याने सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील.

केरळमध्ये येणार : मात्र प्रमाण कमी राहण्याचा अंदाजनवी दिल्ली : मान्सून वेळीच म्हणजे १ जूनला केरळला धडक देणार असल्याची खूशखबर आहे; मात्र पाऊस कमी राहणार असल्याने सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनांना गती द्यावी लागेल.पावसाची टंचाई अपेक्षित असलेल्या ५८० जिल्ह्यांसाठी सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. दुसरीकडे कृषी मंत्रालयाने पीक विमासारख्या योजनांना लोकप्रिय बनविण्यासाठी पावले उचलण्याचा विचार चालविला. मान्सूनची सक्रियता सामान्य दिसत असून, फार तर २ ते ३ दिवसांचा फरक पडू शकतो. सध्यातरी मान्सून विलंबाने येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एल निनो फॅक्टरमुळे पाऊस सामान्यापेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचे हवामान विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले. आकस्मिक योजनांसाठी सज्जता पाऊस सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याच्या शक्यतेमुळे कृषी मंत्रालयाने होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी योजनांची सज्जता करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारांना ५८० जिल्ह्यांमध्ये आकस्मिक योजनांना वेग देण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत स्थानिक गरजांनुसार योजना अद्ययावत केल्या जात आहेत, असे कृषी सचिव सिराज हुसेन यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क) पीक विमा योजनांना बळकटी >  शेतकऱ्यांमध्ये पीक विमा योजना लोकप्रिय बनविण्यावर भर दिला जात आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सामान्यापेक्षा कमी पाऊस राहणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली असून, १५ मे रोजी मान्सूनच्या प्रगतीबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. > स्कायमेट ही खासगी कंपनीही याच काळात मान्सूनची माहिती जारी करेल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) कृषीचा वाटा केवळ १५ टक्के असला ६० टक्के लोकसंख्येची उपजीविका खरीप पिकांवरच निर्भर असते. केवळ ४० टक्के लागवडीखालील जमिनीवर सिंचनसुविधा आहेत.

------------

१ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. दोन ते तीन दिवसांचा फरक पडू शकतो. आम्ही सामान्य पावसाचे भाकीत वर्तवले आहे. दक्षिण किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून हीच आहे. - जतीन सिंग, स्कायमेटचे सीईओ ------------भात पिकासाठी पाऊस वेळेवर हवा > नैर्ऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन हे खरीप पिकांच्या विशेषत: भात रोपांच्या रोवणीसाठी आवश्यक असते. कमी पाऊस तांदळाचे उत्पादन घटविते. > गेल्या वर्षी देशात १२ टक्के कमी पाऊस झाल्याने अन्नधान्य, कापूस आणि तेलबियांचे उत्पन्न १२ टक्क्यांनी घटले आहे. २०१४मध्ये झालेला कमी पाऊस आणि या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला नैराश्य आले. > त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या. २०१४-१५ या वर्षात देशात धान्य उत्पादन तीन टक्क्यांनी कमी होऊन २५.७० कोटी टन राहिले आहे.