शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

मान्सून १ जूनला!

By admin | Updated: May 11, 2015 03:29 IST

मान्सून वेळीच म्हणजे १ जूनला केरळला धडक देणार असल्याची खूशखबर आहे; मात्र पाऊस कमी राहणार असल्याने सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील.

केरळमध्ये येणार : मात्र प्रमाण कमी राहण्याचा अंदाजनवी दिल्ली : मान्सून वेळीच म्हणजे १ जूनला केरळला धडक देणार असल्याची खूशखबर आहे; मात्र पाऊस कमी राहणार असल्याने सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनांना गती द्यावी लागेल.पावसाची टंचाई अपेक्षित असलेल्या ५८० जिल्ह्यांसाठी सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. दुसरीकडे कृषी मंत्रालयाने पीक विमासारख्या योजनांना लोकप्रिय बनविण्यासाठी पावले उचलण्याचा विचार चालविला. मान्सूनची सक्रियता सामान्य दिसत असून, फार तर २ ते ३ दिवसांचा फरक पडू शकतो. सध्यातरी मान्सून विलंबाने येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एल निनो फॅक्टरमुळे पाऊस सामान्यापेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचे हवामान विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले. आकस्मिक योजनांसाठी सज्जता पाऊस सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याच्या शक्यतेमुळे कृषी मंत्रालयाने होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी योजनांची सज्जता करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारांना ५८० जिल्ह्यांमध्ये आकस्मिक योजनांना वेग देण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत स्थानिक गरजांनुसार योजना अद्ययावत केल्या जात आहेत, असे कृषी सचिव सिराज हुसेन यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क) पीक विमा योजनांना बळकटी >  शेतकऱ्यांमध्ये पीक विमा योजना लोकप्रिय बनविण्यावर भर दिला जात आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सामान्यापेक्षा कमी पाऊस राहणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली असून, १५ मे रोजी मान्सूनच्या प्रगतीबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. > स्कायमेट ही खासगी कंपनीही याच काळात मान्सूनची माहिती जारी करेल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) कृषीचा वाटा केवळ १५ टक्के असला ६० टक्के लोकसंख्येची उपजीविका खरीप पिकांवरच निर्भर असते. केवळ ४० टक्के लागवडीखालील जमिनीवर सिंचनसुविधा आहेत.

------------

१ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. दोन ते तीन दिवसांचा फरक पडू शकतो. आम्ही सामान्य पावसाचे भाकीत वर्तवले आहे. दक्षिण किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून हीच आहे. - जतीन सिंग, स्कायमेटचे सीईओ ------------भात पिकासाठी पाऊस वेळेवर हवा > नैर्ऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन हे खरीप पिकांच्या विशेषत: भात रोपांच्या रोवणीसाठी आवश्यक असते. कमी पाऊस तांदळाचे उत्पादन घटविते. > गेल्या वर्षी देशात १२ टक्के कमी पाऊस झाल्याने अन्नधान्य, कापूस आणि तेलबियांचे उत्पन्न १२ टक्क्यांनी घटले आहे. २०१४मध्ये झालेला कमी पाऊस आणि या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला नैराश्य आले. > त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या. २०१४-१५ या वर्षात देशात धान्य उत्पादन तीन टक्क्यांनी कमी होऊन २५.७० कोटी टन राहिले आहे.