शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

माल्याने भारत सोडण्याआधीच ब्रिटीश कंपन्या आणि बँकांमध्ये वळवला पैसा

By admin | Updated: April 22, 2017 11:08 IST

विजय माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - बँकांचे हजारो कोटींचे कर्ज घेऊन पसार झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्या यांना भारतात परत आणण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे असा विश्वास तपास अधिकारी व्यक्त करत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ब्रिटीश सरकारसोबत काही कागदपत्रं शेअर केली आहेत, ज्यानुसार माल्या यांनी काळा पैसा सफेद करण्यासाठी भारतीय बँकांमधून ब्रिटीश कंपन्या आणि ब्रिटीश बँकांमधील खात्यांमध्ये गुंतवणूक केली आहे
.
सक्तवसुली संचलनालयाने तपासातील सर्व माहिती ब्रिटीश सरकासोबत शेअर केली आहे. सीबीआयने याआधीच माल्या यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक करण्याचा आरोप केला असून ईडीच्या माहितीमुळे दावा बळकट झाला आहे. 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे. ही गोष्ट माल्यांच्या विरोधात जाईल अशी अपेक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी 2 मार्च रोजी लंडनला निघून जाण्याआधीच हे सर्व व्यवहार केले आहेत. माल्या यांनी खूप सारा पैसा ब्रिटनधील कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये वळता केला होता. याशिवाय केमॅन आयलँड, मॉरिशिअस आणि इतर देशांमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.  
 
ब्रिटनमध्ये पैशांची अफरातफर केल्याचं सिद्ध झाल्यास कायद्यात शिक्षेसाठी कडक तरतुदी आहेत. त्यादृष्टीने भारताला कारवाई करणं सोपं होणार असून दावा बळकट होणार आहे. माल्या यांना भारताच्या हवाली करायचं की नाही यासंबंधी 17 मे रोजी सुनावणी होणार असून सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाची एक टीम उपस्थित असणार आहे.  माल्या यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर झाल्यास मल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालय सर्व कागदपत्रंही सादर करणार आहे.
 
एप्रिल 17 रोजी स्कॉटलंड यार्डने विजय माल्यांना अटक केली होती. मात्र काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. ब्रिटनबाहेर प्रवास न करण्याच्या अटीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 
 
फेब्रुवारी महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाने ब्रिटन सरकारला मल्या यांना हद्दपार करुन भारताच्या स्वाधिन करावे असे पत्र पाठवले होते. मद्यसम्राट माल्या यांच्याविरुद्ध हवाला व्यवहाराचाही आरोप आहे. माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीने ९४00 कोटी रुपयांची बँकांची थकबाकी दिलेली नाही.
 
 माल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्च 2016 रोजी विजय माल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय माल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय माल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.