शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

माल्याने भारत सोडण्याआधीच ब्रिटीश कंपन्या आणि बँकांमध्ये वळवला पैसा

By admin | Updated: April 22, 2017 11:08 IST

विजय माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - बँकांचे हजारो कोटींचे कर्ज घेऊन पसार झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्या यांना भारतात परत आणण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे असा विश्वास तपास अधिकारी व्यक्त करत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ब्रिटीश सरकारसोबत काही कागदपत्रं शेअर केली आहेत, ज्यानुसार माल्या यांनी काळा पैसा सफेद करण्यासाठी भारतीय बँकांमधून ब्रिटीश कंपन्या आणि ब्रिटीश बँकांमधील खात्यांमध्ये गुंतवणूक केली आहे
.
सक्तवसुली संचलनालयाने तपासातील सर्व माहिती ब्रिटीश सरकासोबत शेअर केली आहे. सीबीआयने याआधीच माल्या यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक करण्याचा आरोप केला असून ईडीच्या माहितीमुळे दावा बळकट झाला आहे. 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे. ही गोष्ट माल्यांच्या विरोधात जाईल अशी अपेक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी 2 मार्च रोजी लंडनला निघून जाण्याआधीच हे सर्व व्यवहार केले आहेत. माल्या यांनी खूप सारा पैसा ब्रिटनधील कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये वळता केला होता. याशिवाय केमॅन आयलँड, मॉरिशिअस आणि इतर देशांमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.  
 
ब्रिटनमध्ये पैशांची अफरातफर केल्याचं सिद्ध झाल्यास कायद्यात शिक्षेसाठी कडक तरतुदी आहेत. त्यादृष्टीने भारताला कारवाई करणं सोपं होणार असून दावा बळकट होणार आहे. माल्या यांना भारताच्या हवाली करायचं की नाही यासंबंधी 17 मे रोजी सुनावणी होणार असून सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाची एक टीम उपस्थित असणार आहे.  माल्या यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर झाल्यास मल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालय सर्व कागदपत्रंही सादर करणार आहे.
 
एप्रिल 17 रोजी स्कॉटलंड यार्डने विजय माल्यांना अटक केली होती. मात्र काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. ब्रिटनबाहेर प्रवास न करण्याच्या अटीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 
 
फेब्रुवारी महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाने ब्रिटन सरकारला मल्या यांना हद्दपार करुन भारताच्या स्वाधिन करावे असे पत्र पाठवले होते. मद्यसम्राट माल्या यांच्याविरुद्ध हवाला व्यवहाराचाही आरोप आहे. माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीने ९४00 कोटी रुपयांची बँकांची थकबाकी दिलेली नाही.
 
 माल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्च 2016 रोजी विजय माल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय माल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय माल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.