शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माल्याने भारत सोडण्याआधीच ब्रिटीश कंपन्या आणि बँकांमध्ये वळवला पैसा

By admin | Updated: April 22, 2017 11:08 IST

विजय माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - बँकांचे हजारो कोटींचे कर्ज घेऊन पसार झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्या यांना भारतात परत आणण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे असा विश्वास तपास अधिकारी व्यक्त करत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ब्रिटीश सरकारसोबत काही कागदपत्रं शेअर केली आहेत, ज्यानुसार माल्या यांनी काळा पैसा सफेद करण्यासाठी भारतीय बँकांमधून ब्रिटीश कंपन्या आणि ब्रिटीश बँकांमधील खात्यांमध्ये गुंतवणूक केली आहे
.
सक्तवसुली संचलनालयाने तपासातील सर्व माहिती ब्रिटीश सरकासोबत शेअर केली आहे. सीबीआयने याआधीच माल्या यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक करण्याचा आरोप केला असून ईडीच्या माहितीमुळे दावा बळकट झाला आहे. 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे. ही गोष्ट माल्यांच्या विरोधात जाईल अशी अपेक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी 2 मार्च रोजी लंडनला निघून जाण्याआधीच हे सर्व व्यवहार केले आहेत. माल्या यांनी खूप सारा पैसा ब्रिटनधील कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये वळता केला होता. याशिवाय केमॅन आयलँड, मॉरिशिअस आणि इतर देशांमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.  
 
ब्रिटनमध्ये पैशांची अफरातफर केल्याचं सिद्ध झाल्यास कायद्यात शिक्षेसाठी कडक तरतुदी आहेत. त्यादृष्टीने भारताला कारवाई करणं सोपं होणार असून दावा बळकट होणार आहे. माल्या यांना भारताच्या हवाली करायचं की नाही यासंबंधी 17 मे रोजी सुनावणी होणार असून सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाची एक टीम उपस्थित असणार आहे.  माल्या यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर झाल्यास मल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालय सर्व कागदपत्रंही सादर करणार आहे.
 
एप्रिल 17 रोजी स्कॉटलंड यार्डने विजय माल्यांना अटक केली होती. मात्र काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. ब्रिटनबाहेर प्रवास न करण्याच्या अटीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 
 
फेब्रुवारी महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाने ब्रिटन सरकारला मल्या यांना हद्दपार करुन भारताच्या स्वाधिन करावे असे पत्र पाठवले होते. मद्यसम्राट माल्या यांच्याविरुद्ध हवाला व्यवहाराचाही आरोप आहे. माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीने ९४00 कोटी रुपयांची बँकांची थकबाकी दिलेली नाही.
 
 माल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्च 2016 रोजी विजय माल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय माल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय माल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.