शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोहपा... रस्ते

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
रहदारीस अडथळा : देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहपा : कळमेश्वर तालुक्यातील मोहपा व कळमेश्वर परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दैनावस्थामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. परंतु, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पादचारी व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
परिसरातील गोंडखैरी ते बोरगाव, लोणारा-सावंगी, गुमथळा ते आष्टीकला, गुमथळा-सेलू, सेलू-कळंबी साहुली, धापेवाडा ते निळगाव पांदन रस्ता, निमजी ते आष्टीकला, गुमथळा ते उपरवाही, सावंगा ते लिंगा, कळमेश्वर - गोवरी-तोंडाखैरी, कळमेश्वर-घोराड-मोहपा या रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. उबाळी गावातील रस्त्यालगतच्या घरातील सांडपाणी व गटाराचे पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे या मार्गावरून रहादारी करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्याचीही चांगलीच फजिती होते. या ठिकाणी अनेकदा दुचाकी वाहने स्लिप झाल्याने अपघात घडले आहेत.
ब्राह्मणी येथे धापेवाडा आदासा -सावनेर मार्गावर व काटोल - वरुड या रस्त्यांचे काम संथगतीने सुरू आहे. खडीकरणाच्या कामासाठी खोदलेले रस्ते लवकर भरण्यात येत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्यात पाणी साचून राहात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यालगत मजबूत नाल्या आवश्यकता असून रस्त्याच्या कडेला असलेले उकिरडे पसरले असून सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
ब्राह्मणी मार्गावर प्रवासी निवारा होता. या निवाऱ्याच्या इमारतीला भेगा पडल्यामुळे पाडण्यात आला. त्यानंतर येथे अद्यापही प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले नाही. काटोल रस्त्यावरदेखील प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. अशावेळी प्रवासी निवारा नसल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होते.
रस्त्याच्या दैनावस्थेमुळे परिसरातील मार्गात अनेकदा अपघात घडले. यात अनेकांना जखमी व्हावे लागले तर काहींना जीवही गमवावा लागला. कळमेश्वर -गोंडखैरी मार्गात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश रस्त्याने जड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था होत आहे. परिसरातील या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.