शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

मोहपा... रस्ते

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
रहदारीस अडथळा : देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहपा : कळमेश्वर तालुक्यातील मोहपा व कळमेश्वर परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दैनावस्थामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. परंतु, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पादचारी व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
परिसरातील गोंडखैरी ते बोरगाव, लोणारा-सावंगी, गुमथळा ते आष्टीकला, गुमथळा-सेलू, सेलू-कळंबी साहुली, धापेवाडा ते निळगाव पांदन रस्ता, निमजी ते आष्टीकला, गुमथळा ते उपरवाही, सावंगा ते लिंगा, कळमेश्वर - गोवरी-तोंडाखैरी, कळमेश्वर-घोराड-मोहपा या रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. उबाळी गावातील रस्त्यालगतच्या घरातील सांडपाणी व गटाराचे पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे या मार्गावरून रहादारी करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्याचीही चांगलीच फजिती होते. या ठिकाणी अनेकदा दुचाकी वाहने स्लिप झाल्याने अपघात घडले आहेत.
ब्राह्मणी येथे धापेवाडा आदासा -सावनेर मार्गावर व काटोल - वरुड या रस्त्यांचे काम संथगतीने सुरू आहे. खडीकरणाच्या कामासाठी खोदलेले रस्ते लवकर भरण्यात येत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्यात पाणी साचून राहात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यालगत मजबूत नाल्या आवश्यकता असून रस्त्याच्या कडेला असलेले उकिरडे पसरले असून सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
ब्राह्मणी मार्गावर प्रवासी निवारा होता. या निवाऱ्याच्या इमारतीला भेगा पडल्यामुळे पाडण्यात आला. त्यानंतर येथे अद्यापही प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले नाही. काटोल रस्त्यावरदेखील प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. अशावेळी प्रवासी निवारा नसल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होते.
रस्त्याच्या दैनावस्थेमुळे परिसरातील मार्गात अनेकदा अपघात घडले. यात अनेकांना जखमी व्हावे लागले तर काहींना जीवही गमवावा लागला. कळमेश्वर -गोंडखैरी मार्गात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश रस्त्याने जड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था होत आहे. परिसरातील या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.