शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

मोहपा... रस्ते

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

कळमेश्वर व मोहपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
रहदारीस अडथळा : देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहपा : कळमेश्वर तालुक्यातील मोहपा व कळमेश्वर परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दैनावस्थामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. परंतु, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पादचारी व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
परिसरातील गोंडखैरी ते बोरगाव, लोणारा-सावंगी, गुमथळा ते आष्टीकला, गुमथळा-सेलू, सेलू-कळंबी साहुली, धापेवाडा ते निळगाव पांदन रस्ता, निमजी ते आष्टीकला, गुमथळा ते उपरवाही, सावंगा ते लिंगा, कळमेश्वर - गोवरी-तोंडाखैरी, कळमेश्वर-घोराड-मोहपा या रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. उबाळी गावातील रस्त्यालगतच्या घरातील सांडपाणी व गटाराचे पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे या मार्गावरून रहादारी करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्याचीही चांगलीच फजिती होते. या ठिकाणी अनेकदा दुचाकी वाहने स्लिप झाल्याने अपघात घडले आहेत.
ब्राह्मणी येथे धापेवाडा आदासा -सावनेर मार्गावर व काटोल - वरुड या रस्त्यांचे काम संथगतीने सुरू आहे. खडीकरणाच्या कामासाठी खोदलेले रस्ते लवकर भरण्यात येत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्यात पाणी साचून राहात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यालगत मजबूत नाल्या आवश्यकता असून रस्त्याच्या कडेला असलेले उकिरडे पसरले असून सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
ब्राह्मणी मार्गावर प्रवासी निवारा होता. या निवाऱ्याच्या इमारतीला भेगा पडल्यामुळे पाडण्यात आला. त्यानंतर येथे अद्यापही प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले नाही. काटोल रस्त्यावरदेखील प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. अशावेळी प्रवासी निवारा नसल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होते.
रस्त्याच्या दैनावस्थेमुळे परिसरातील मार्गात अनेकदा अपघात घडले. यात अनेकांना जखमी व्हावे लागले तर काहींना जीवही गमवावा लागला. कळमेश्वर -गोंडखैरी मार्गात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश रस्त्याने जड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था होत आहे. परिसरातील या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.