शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केरळविषयी मोदींनी दाखवलेली आत्मियता बेगडी - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 06:41 IST

अमेठीतून पराभूत झाले असले तरी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

तिरुवम्बडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळविषयी दाखविलेली आत्मीयता बेगडी आहे अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना मोदींनी नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे असा आरोपही त्यांनी केला.

अमेठीतून पराभूत झाले असले तरी केरळमधीलवायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे वायनाडमधील मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौºयाच्या शेवटच्या दिवशी कोझीकोळ जिल्ह्यातील ऐंगपुझा या ठिकाणी जाहीर सभेत राहुल गांधी रविवारी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मान्य नसणाऱ्यांवर भाजपला राग आहे. या पक्षाने देशभरात विद्वेष पसरवला आहे. भाजपची व बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळी वागणूक देतात. उत्तर प्रदेशला नरेंद्र मोदी जितकी मदत करतात तितकी ते केरळला करणार नाहीत. कारण या राज्यात माकपचे सरकार आहे. पंतप्रधानांकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा नाही.

केरळच्या गुरुवायूर येथील कृष्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच म्हणाले होते की, निवडणुकांमध्ये मिळणाºया मतांवर डोळा ठेवून भाजप काम करत नाही. आम्हाला देश घडवायचा आहे, समर्थ बनवायचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा आणखीन वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये काही वैचारिक मतभेद जरूर आहेत. मात्र ते बाजूला सारून वायनाड व केरळच्या विकासासाठी आम्ही एकत्रितरित्या काम करू. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडKeralaकेरळ