शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

केरळविषयी मोदींनी दाखवलेली आत्मियता बेगडी - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 06:41 IST

अमेठीतून पराभूत झाले असले तरी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

तिरुवम्बडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळविषयी दाखविलेली आत्मीयता बेगडी आहे अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना मोदींनी नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे असा आरोपही त्यांनी केला.

अमेठीतून पराभूत झाले असले तरी केरळमधीलवायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे वायनाडमधील मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौºयाच्या शेवटच्या दिवशी कोझीकोळ जिल्ह्यातील ऐंगपुझा या ठिकाणी जाहीर सभेत राहुल गांधी रविवारी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मान्य नसणाऱ्यांवर भाजपला राग आहे. या पक्षाने देशभरात विद्वेष पसरवला आहे. भाजपची व बिगरभाजप पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळी वागणूक देतात. उत्तर प्रदेशला नरेंद्र मोदी जितकी मदत करतात तितकी ते केरळला करणार नाहीत. कारण या राज्यात माकपचे सरकार आहे. पंतप्रधानांकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा नाही.

केरळच्या गुरुवायूर येथील कृष्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच म्हणाले होते की, निवडणुकांमध्ये मिळणाºया मतांवर डोळा ठेवून भाजप काम करत नाही. आम्हाला देश घडवायचा आहे, समर्थ बनवायचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा आणखीन वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये काही वैचारिक मतभेद जरूर आहेत. मात्र ते बाजूला सारून वायनाड व केरळच्या विकासासाठी आम्ही एकत्रितरित्या काम करू. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडKeralaकेरळ