शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मोदींचे ‘पीस मिशन’

By admin | Updated: May 19, 2016 05:29 IST

मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले आहेत. मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाचा अंक पार पाडला जाईल, तेव्हा शांतता मंत्रालयाची घोषणा केली जाऊ शकते, असे त्यांच्या निकटस्थ सूत्रांनी सांगितले आहे.गृहमंत्रालयाच्या अखत्यारित जातीय सलोख्यासाठी स्थापन करण्यात आलेला आयोग अपेक्षित उद्दिष्ट साध्य करू शकला नसल्याचे मोदींना वाटते. विविध समुदायांमध्ये सलोखा आणि शांतता राखण्यात अल्पसंख्यक मंत्रालयालाही यश मिळालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र शांतता मंत्रालयच हा उद्देश साध्य करू शकेल, असा मोदींना विश्वास आहे. नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातला मोदींनी भेट दिली, त्यावेळी वेगवेगळ्या स्वरूपात अशी मंत्रालये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तूर्तास मोदींच्या डोक्यातील ही कल्पना अगदी बाल्यावस्थेत असून, अद्याप पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ)त्यासंबंधी आराखड्याचा विचारही केलेला नाही. शांतता आणि समाधान मंत्रालय स्थापन करण्याची कल्पना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी गेल्या महिन्यात मोदींची भेट घेतली, त्या वेळी मांडली होती. राज्यातील जनतेच्या समाधानाचा आलेख मोजण्यासाठी तसा विभाग स्थापन करण्याची घोषणा करण्याचा विचार चौहान यांनी या भेटीत बोलून दाखविला होता.>मोदी जाणार मंत्र्यांच्या दारी.....आश्चर्याची बाब म्हणजे, मोदींनी सहा ज्येष्ठ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जात संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विदेशमंत्री सुषमा स्वराज आदींचा त्यात समावेश आहे. या आधी मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानालाच भेट देत असत. अलीकडे त्यांनी स्वराज यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पायधूळ झाडली होती. संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानीही ते अधूनमधून जात होते.मंत्र्याशी संवादाविना निर्णय घेण्याचा भाग आता इतिहासजमा होणार आहे. अलीकडेच मोदींनी या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांसोबत चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे. मोदींच्या शांतता मंत्रालयाच्या भाग म्हणून मोदींनी पीस मिशन अवलंबले असावे.भोजन बैठकींतून मंत्र्यांशी संवाद...शांतता मंत्रालय कधीही स्थापन होवो. सध्या तरी मोदींनी वैयक्तिक पातळीवर पीस मिशन चालविले आहे, ते डीनर डिप्लोमसी सुरू करीत. ज्येष्ठ मंत्र्यांशी समोरासमोर थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी भोजन बैठकींची मालिका चालविली आहे. मोदींचा आपल्यावर विश्वास नाही, निर्णयापूर्वीही ते आपल्याशी सल्लामसलत करीत नाही, अशी खंत दीर्घ काळापासून मंत्र्यांना वाटते आहे.