शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात..

By admin | Updated: August 31, 2014 03:18 IST

जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे.

मोदी हे जरा जास्तच शिस्तप्रिय आहेत. सहकारी मंत्री आणि नोकरशाहीला या करडय़ा शिस्तीचा जाच होतो, असे नाही का वाटत?  
निर्णय तातडीने घेतले नाहीत आणि त्याची आग्रहपूर्वक अंमलबजावणी केली नाही तर मग आधीच्या आणि आमच्या सरकारमध्ये काय फरक राहील? आम्हीही संथगतीने चाललो तर उद्या तुम्हीच लिहिणार की आम्ही ढिम्म आहोत. या देशाला गतिमान कारभाराची आणि परिणामकारक प्रशासनाची नितांत आवश्यकता आहे. ते मोदी करीत असल्याचा नागरिकांना आनंदच आहे. अशी शिस्त आवश्यकच असल्याची देशात भावना आहे. ‘पाहून सांगतो अन् सांगून पाहतो’ ही नोकरशाहीची प्रवृत्ती बदलली पाहिजे. लोककल्याणासाठी शिस्त गरजेची आहे.
मोदी यांच्या नेतृत्वात ‘अच्छे दिन कब आनेवाले हैं?’ असे विरोधक विचारत आहेत. ते कधी येतील?
विरोधकांसाठी आणखी बरीच वर्षे अच्छे दिन येण्याची शक्यता नाही! विरोधकांचे ‘बुरे दिन’ सुरू असल्याने त्यांना चांगले काही दिसत नाही. मोदी यांनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रलंबित योजना, कामांना गती दिली आहे. त्याचे चांगले परिणाम वर्षभराच्या आत दिसतील. आधीच्या आणि आताच्या सरकारमधील सर्वात मूलभूत बदल म्हणजे जनतेच्या प्रश्नांप्रति या सरकारमध्ये संवेदनशीलता आहे. तोच मोदी यांच्या कामकाजाचा मुख्य आधार आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने या 1क्क् दिवसांत कुठले महत्त्वाचे निर्णय घेता आले?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आम्ही करणार आहोत. मराठवाडय़ाचा औद्योगिक  अनुशेष दूर करण्यास औरंगाबादमध्ये 
ड्रायपोर्ट बांधले जाईल. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नवी मुंबई विमानतळ लवकरच मार्गी लागेल. आळंदी-पुणो-पंढरपूर व देहू-पुणो-पंढरपूर या दोन मार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला. मुंबई पोर्ट 
ट्रस्टचे पुनरुज्जीवन करणार. ट्रस्टची एक इंचही जमीन बिल्डरच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. देशातील बंदरांचा सामूहिक विकास ‘सागरमाला’ योजनेद्वारे केला जाईल. 
 
मोदी यांचे पंतप्रधान म्हणून कुठले गुण आपल्याला भावतात?
जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे. 
 
गडकरी म्हणतात..
महत्त्वाचे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी आपले सहकारी व मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यांनी प्रतिकूल मत दिले तरी त्याचा सन्मान करतात़ एवढेच नव्हे तर प्रसंगी आपले मतही बदलतात, असा आपला अनुभव असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाला 1क्क् दिवस पूर्ण होत असताना, त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी 
यदु जोशी  यांनी केलेली बातचीत.