शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात..

By admin | Updated: August 31, 2014 03:18 IST

जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे.

मोदी हे जरा जास्तच शिस्तप्रिय आहेत. सहकारी मंत्री आणि नोकरशाहीला या करडय़ा शिस्तीचा जाच होतो, असे नाही का वाटत?  
निर्णय तातडीने घेतले नाहीत आणि त्याची आग्रहपूर्वक अंमलबजावणी केली नाही तर मग आधीच्या आणि आमच्या सरकारमध्ये काय फरक राहील? आम्हीही संथगतीने चाललो तर उद्या तुम्हीच लिहिणार की आम्ही ढिम्म आहोत. या देशाला गतिमान कारभाराची आणि परिणामकारक प्रशासनाची नितांत आवश्यकता आहे. ते मोदी करीत असल्याचा नागरिकांना आनंदच आहे. अशी शिस्त आवश्यकच असल्याची देशात भावना आहे. ‘पाहून सांगतो अन् सांगून पाहतो’ ही नोकरशाहीची प्रवृत्ती बदलली पाहिजे. लोककल्याणासाठी शिस्त गरजेची आहे.
मोदी यांच्या नेतृत्वात ‘अच्छे दिन कब आनेवाले हैं?’ असे विरोधक विचारत आहेत. ते कधी येतील?
विरोधकांसाठी आणखी बरीच वर्षे अच्छे दिन येण्याची शक्यता नाही! विरोधकांचे ‘बुरे दिन’ सुरू असल्याने त्यांना चांगले काही दिसत नाही. मोदी यांनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रलंबित योजना, कामांना गती दिली आहे. त्याचे चांगले परिणाम वर्षभराच्या आत दिसतील. आधीच्या आणि आताच्या सरकारमधील सर्वात मूलभूत बदल म्हणजे जनतेच्या प्रश्नांप्रति या सरकारमध्ये संवेदनशीलता आहे. तोच मोदी यांच्या कामकाजाचा मुख्य आधार आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने या 1क्क् दिवसांत कुठले महत्त्वाचे निर्णय घेता आले?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आम्ही करणार आहोत. मराठवाडय़ाचा औद्योगिक  अनुशेष दूर करण्यास औरंगाबादमध्ये 
ड्रायपोर्ट बांधले जाईल. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नवी मुंबई विमानतळ लवकरच मार्गी लागेल. आळंदी-पुणो-पंढरपूर व देहू-पुणो-पंढरपूर या दोन मार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला. मुंबई पोर्ट 
ट्रस्टचे पुनरुज्जीवन करणार. ट्रस्टची एक इंचही जमीन बिल्डरच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. देशातील बंदरांचा सामूहिक विकास ‘सागरमाला’ योजनेद्वारे केला जाईल. 
 
मोदी यांचे पंतप्रधान म्हणून कुठले गुण आपल्याला भावतात?
जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे. 
 
गडकरी म्हणतात..
महत्त्वाचे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी आपले सहकारी व मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यांनी प्रतिकूल मत दिले तरी त्याचा सन्मान करतात़ एवढेच नव्हे तर प्रसंगी आपले मतही बदलतात, असा आपला अनुभव असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाला 1क्क् दिवस पूर्ण होत असताना, त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी 
यदु जोशी  यांनी केलेली बातचीत.