शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मोदींचे पुढचे लक्ष्य यूपी, बिहार विधानसभा

By admin | Updated: November 10, 2014 03:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्ष्य ठरविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्ष्य ठरविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ६६ पैकी १७ म्हणजे एक चतुर्थांश मंत्री या दोन राज्यांतील आहेत. बिहारमध्ये पुढीलवर्षी तर उत्तर प्रदेशात दोन तीन वर्षांत विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आत्तापासूनच या दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.‘किमान शासन अधिकाधिक प्रशासन’ असा नारा देणाऱ्या मोदींनी नव्या विस्तारात मंत्र्यांची संख्या ६६ पर्यंत वाढविली आहे. प्रत्यक्षात ते १३-१४ मंत्र्यांना स्थान देऊ शकले असते. या विस्तारात त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक प्रतिनिधित्व दिले आहे. या राज्यातून स्वत: मोदींसह गृहमंत्री राजनाथसिंग, जलसंसाधन मंत्री उमा भारती, सूक्ष्म उद्योगमंत्री कलराज मिश्र, कृषी आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्री संजीव बाल्यान यांना स्थान आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही उत्तर प्रदेशातूनच राज्यसभेवर निवडून आणले जाईल. महेश शर्मा राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), मुख्तार अब्बास नकवी, राम शंकर कठेरिया आणि साध्वी निरंजन ज्योती यांना राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. त्यापैकी तिघे ब्राह्मण, एक राजपूत, तीन मागासवर्गीय, प्रत्येकी एक जाट, मुस्लीम आणि दलित आहे. बिहारचे राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवत विस्तारात राजपूत, भूमिहार आणि यादव समुदायाला स्थान मिळाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजीवप्रताप रुडी यांना राज्यमंत्र्यांचा स्वतंत्र प्रभार मिळाला आहे. वादग्रस्त विधाने आणि आपल्या निवासस्थानावर १.१४ कोटी रुपये खर्च केल्यामुळे चर्चेत आलेले गिरीराजसिंग तसेच कधीकाळी लालूप्रसाद यादव यांचा उजवा हात राहिलेले रामकृपाल यादव यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडली. रामकृपाल यांनी लालूप्रसाद यांच्या कन्या मिसा भारती यांचा पराभव केला होता. या राज्यातून यापूर्वी कृषिमंत्री राधामोहन सिंग, कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांना स्थान दिले होते. बिहारमधील मंत्र्यांची संख्या सात झाली आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांच्या रूपाने झारखंडला प्रतिनिधित्व मिळाले आहे. लोकप्रिय गायक बाबुल सुप्रियो यांना राज्यमंत्री बनवत मोदींनी प.बंगाललाही स्थान दिले. ईशान्येतून आसाम आणि नागालॅडला प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या चमूची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत.