शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नवरात्रीत मोदींचा कडक उपवास, कामाचं वेळापत्रक मात्र टाईट

By admin | Updated: April 1, 2017 10:26 IST

चैत्र नवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ दिवसांचा उपवास चालू आहे. यावेळी ते फक्त गरम पाणी, दूध आणि ज्यूस घेणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - चैत्र नवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ दिवसांचा उपवास चालू आहे. यावेळी ते फक्त गरम पाणी, दूध आणि ज्यूस घेणार आहेत. इतका कडक उपवास असतानाही मोदींचं वेळात्रकही तितकंच व्यस्त असणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोदी पायभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि अध्यात्माशी संबंधित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणार आहेत. येत्या रविवारी नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या रस्ता बोगद्याचं लोकार्पण करणार आहेत. जम्मूला श्रीनगरशी जोडणा-या चेनानी - नाशरी बोगद्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होणार आहे.
 
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद हाऊसमध्ये मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर चेनानी - नाशरी बोगद्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या बोगद्याचं उद्घाटन झाल्यानंतर नरेंद्र मोदी उधमपूरमधील एका प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. 
 
चैत्र नवरात्रीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष महत्व देतात. याशिवाय शारदीय नवरात्रातही मोदी नऊ दिवस उपवास ठेवतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही नवरात्रींमध्ये उपवास ठेवतात. उपवासात ते फक्त पाणी, दूध आणि ज्यूस घेतात. मात्र याचा त्यांच्या कामावर काहीही परिणाम होत नाही. नेहमीच्या ऊर्जेने स्वत:ला झोकून देत ते काम करत असतात". 
 
इतकंच नाही तर या व्यस्त वेळापत्रक आणि उपवासातून वेळ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट इंडिया हॅकथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम शनिवारी सकाळी 8 ते रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. नरेंद्र मोदी शनिवारी रात्री 10 वाजता सहभागी झालेल्यांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी किमान 45 मिनिटे भाषण करतील अशी माहिती आहे.