शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मोदींचे पतन अटळ

By admin | Updated: September 21, 2015 23:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजाच्या सर्वच घटकांना दूर सारून आपल्या पतनाची पटकथा लिहीत आहेत. आता या देशातील शेतकरी त्यांच्यावर टीका करीत नाहीत तर अतिशय वाईट शब्दात त्यांचा समाचार घेत आहेत

मथुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजाच्या सर्वच घटकांना दूर सारून आपल्या पतनाची पटकथा लिहीत आहेत. आता या देशातील शेतकरी त्यांच्यावर टीका करीत नाहीत तर अतिशय वाईट शब्दात त्यांचा समाचार घेत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी आश्वासने न पाळल्याबद्दल पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.मथुरेत काँग्रेसच्या चिंतन बैठकीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, ‘अ‍ॅप्पल’ कंपनीत नवा प्राण फुंकणारे स्टीव जॉब्स यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, जेव्हा रालोआचे पतन घडून येईल आणि स्वत:लाच सर्वाधिक नुकसान पोहोचविणारे नरेंद्र मोदी ‘बाहेर’ पडतील तेव्हा निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका चमूप्रमाणे एकजूट होऊन काम केले पाहिजे. अच्छे दिन येतील, असे आश्वासन मोदींनी शेतकऱ्यांना दिले होते. आता शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मी देशात जेथे जेथे जातो तेथे तेथे शेतकरी मोदींना शिव्या देतात. शेतकरी मोदींवर टीका करीत नाहीत तर अपशब्द वापरतात. युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. तीनवेळा आश्वासने देऊनही अद्याप एक पद, एक पेन्शन मिळालेले नाही.मोदींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. काँग्रेसने त्यांचे जेवढे नुकसान केले आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान ते स्वत:ला पोहोचवित आहेत. आम्ही आपले स्थान पक्के केले पाहिजे. मोदींचे पतन निश्चित आहे. ते बाहेर जातील तेव्हा जी जागा रिक्त होईल ती आम्हाला भरायची आहे. तुम्ही मोदींवरील हल्ले सुरूच ठेवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले. आकाश काळे आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले, तर संघ आणि भाजपचे सर्वजण आकाश काळे आहे, असेच म्हणतील. चिंतन बैठक जर संघाची असती आणि आकाश काळे आहे, असे भागवत म्हणाले असते, तर कुणीही त्याचा विरोध करून सत्य मांडण्याची हिंमत दाखविली नसती. आकाश काळेच आहे, असे सर्वांनी मान्य केले असते. काँग्रेसमध्ये मात्र असे नाही. संघ आणि काँग्रेसच्या विचारसरणी हाच मूलभूत फरक आहे. संघ ही विचारसरणी नसून ती हुकूमशाही प्रवृत्ती आहे. काँग्रेसची विचारसरणी हे विविधतेत एकतेची आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.(वृत्तसंस्था)