शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची मंजुरी : एअर इंडियाची इमारत ‘जेएनपीटी’ला विकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 04:33 IST

एका खिशातील पैसा दुसऱ्या खिशात

नवी दिल्ली : मुंबईत नरिमन पॉर्इंटच्या कोप-यावर असलेली आणि त्या भागाची ठळक ओळख असलेली ‘एअर इंडिया’ची २३ मजली इमारत जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) विकण्याच्या दृष्टीने सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. डबघाईला आलेल्या व विकत घ्यायलाही कोणी तयार नसलेल्या एअर इंडियात भक्कम नफ्यात असलेल्या ‘जेएनपीटी’चा पैसा वळविण्याचा हा प्रकार आहे.एअर इंडियाने मोठ्या शहरांमधील स्थावर मालमत्तांच्या विक्रीने दात कोरून पोट भरण्याचा प्रयोग याआधीही केला होता. परंतु एक कंपनी म्हणून या सरकारी विमान कंपनीचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न फसल्यानंतर एकेकाळी एअर इंडियाचे मुख्यालय असलेली ही इमारत विकण्याचा प्रस्ताव पुढे आला. अधिकृत सूत्रांनुसार या विक्रीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर आता हा व्यवहाराचा तपशील ठरविण्यासाठी नागरी विमान वाहतूक आणि जहाज वाहतूक या दोन संबंधित मंत्रालयांच्या सचिवांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती इमारतीचे मूल्यांकनही ठरवील.स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने ‘एअर इंडिया’ची ही जणू दुभती गाय आहे. इमारतीचे मोक्याचे ठिकाण लक्षात घेता बाजारात तिला चांगली किंमत येऊ शकेल. मात्र सरकारच्याच दोन खात्यांनी आपसात खरेदी-विक्री केली तर अपेक्षित मोल पदरी पडणार नाही, यादृष्टीने एअर इंडियामधील अधिकाºयांच्या एका वर्गाने या आपसातील व्यवहारास सुरुवातीस विरोध केल्याचे कळते. परंतु खुद्द पंतप्रधानांनीच हिरवा कंदील दाखविल्यावर हा व्यवहार पुढे नेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असे सूत्रांकडून समजते.‘जेएनपीटी’ हे कन्टेनर माल वाहतुकीचे देशातील सर्वात मोठे बंदर आहे. गेल्या वर्षी देशातील ५५ टक्के कन्टेनर जलवाहतूक या बंदरातून झाली. या बंदराचा वार्षिक नफा १,३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. अशा या भक्कम नफा कमावणाºया एका सरकारी आस्थापनाने डामाडौल झालेल्या दुसºया सरकारी आस्थापनात पैसा घालणे म्हणजे सरकारी वहीखात्यांत एकीकडचा तोटा दुसरीकडे फिरविण्यासारखे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.एअर इंडियाचे खासगीकरण तूर्तास बारगळले असले तरी व्यवस्थापन व्यवस्था व कार्यक्षमता यात येत्या दीड वर्षात लक्षणीय बदल झाल्याचे दिसेल, अशा विश्वास वित्तमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारीच व्यक्त केला होता.नाव कायम ठेवणारसरकारने एअर इंडिया विकायला काढली तेव्हा अन्य अटींसोबत नव्या मालकाने कंपनीचे नाव तेच कायम ठेवावे, अशी अट घातली होती. ज्यांनी सुरुवातीस रस दाखविला त्यांनी या अटीस आक्षेप घेतला होता. आताही इमारत ‘जेएनपीटी’ने घेतली तरी तिचे नाव आहे तेच कायम ठेवले जाईल, असे सांगितले जात आहे. विक्रेता आणि ग्राहक या दोघांचीही धनी एकच असल्याने यावेळी अडचण येईल, असे दिसत नाही.अन्य विक्रीतून ५४३ कोटीएअर इंडियाचा संचित तोटा १५ हजार कोटींहून अधिक व कर्जाचा बोजा ५० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.स्थावर मालमत्ता विकून पैसे उभे करण्याच्या योजनेत याआधी मुंबई व चेन्नई येथील मालमत्ता विकून ५४३ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी मुंबईतील स्टर्लिंंग अपार्टमेंट््समधील सहा फ्लॅट स्टेट बँकेला विकून २२ कोटी रुपये आले होते.एअर इंडिया इमारतीतील अनेक मजले भाड्याने दिलेले आहेत. गेल्या पाच वर्षांत भाड्यापोटी तब्बल २९१ कोटी मिळाले आहेत.