शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

"मोदी" लाट कायम, आज पुन्हा निवडणूक झाल्यास मोदी सरकार येईल सत्तेवर

By admin | Updated: May 23, 2017 08:33 IST

तब्बल तीन वर्षांपुर्वी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारने निवडणूक जिंकत केंद्रात सत्ता मिळवली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - तब्बल तीन वर्षांपुर्वी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारने निवडणूक जिंकत केंद्रात सत्ता मिळवली. एकीकडे तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण होत असल्याने केंद्र सरकार आपण केलेल्या कामांचा प्रचार करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र केंद्र सरकारचा कुचकामीपणा लोकांसमोर आणण्याचा दावा करत आहे. दरम्यान एका सर्व्हेनुसार 2014 प्रमाणे अद्यापही मोदी लाट कायम आहे. जर आजच्या घडीला निवडणुका घेतल्या तर मोदी सरकारच सत्तेवर येईल असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. 
 
एनडीए पुन्हा पार करेल 300 चा आकडा
एबीपी न्यूज-सीएसडीएस- लोकनितीने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज निवडणुका झाल्यास एनडीएला 331 जागा मिळू शकतात. 2014 मध्ये एनडीएला 335 जागा मिळाल्या होत्या. युपीएसाठी 104 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2014 शी तुलना करता 44 जागा जास्त दाखवण्यात आल्या आहेत. एनडीएच्या मतांमध्ये सात टक्क्यांची वाढ दाखवण्यात आली आहे. 
 
कसा करण्यात आला सर्व्हे
एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार 1 मे ते 15 मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. यासाठी 19 राज्यांमधील लोकांशी बातचीत करण्यात आली. मतदान केंद्रांवरील 11 हजार 373 लोकांची मत जाणून घेण्यात आली आणि त्यानंतर हा निकाल आला.
 
पूर्व भारतात एनडीएला जास्त जागांचा अंदाज
एबीपी न्यूज-सीएसडीएस- लोकनितीच्या सर्व्हेनुसार बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि पुर्वेकडील राज्यांमध्ये एनडीएला 2014च्या तुलनेत जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या 142 जागा आहेत. सर्व्हेनुसार एनडीएला 71 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 2014 च्या तुलनेत 16 जागांनी जास्त आहे. युपीएला मात्र याठिकाणी 25 जागांचा तोटा होऊ शकतो. 2014 मध्ये युपीएला 28 जागा मिळाल्या होत्या. आज निवडणूक झाल्यास इतर खात्यांमध्ये 46 जागा येऊ शकतात, ज्या 19 ने कमी आहेत. पूर्व भारतात एनडीएच्या मतांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 
 
बिहार आणि झारखंडमध्ये मात्र एनडीएला नुकसान होऊ शकतं. सर्व्हेनुसार भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले तरी लालूप्रसाद यादव यांना मात्र याचा फटका बसणार नाही. तसंच उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये एनडीएला काही जागांचं नुकसान होऊ शकतं. उत्तर भारतातील एकूण 151 जागांपैकी एनडीएला 116 जागा मिळू शकतात, ज्या 2014 च्या तुलनेता 15 ने कमी आहेत. युपीएला 15 जागा मिळू शकतात. त्यांना नऊ जागांचा फायदा होऊ शकतो. सर्व्हेनुसार हरियाणा, पंजाबमध्ये एनडीएला नुकसान होऊ शकतं. उत्तर भारतात एनडीएला 50 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर युपीएला 18 टक्के मतदान होऊ शकतं.