शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

‘मोदींचे आवाहन हृदयापासून हवे’

By admin | Updated: August 11, 2016 01:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘इन्सानियत’, जमुरियत’ आणि ‘काश्मिरियत’ ही आवाहने ओठांतूनच नव्हे तर हृदयापासून लोकांपर्यंत गेली पाहिजेत तरच हृदय आणि मन यांची एकात्मता साधली जाईल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘इन्सानियत’, जमुरियत’ आणि ‘काश्मिरियत’ ही आवाहने ओठांतूनच नव्हे तर हृदयापासून लोकांपर्यंत गेली पाहिजेत तरच हृदय आणि मन यांची एकात्मता साधली जाईल, अशा शब्दांत बुधवारी काँग्रेसने मोदी यांना राज्यसभेत फटकारले. काश्मीरमधील विद्यमान परिस्थितीचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर खोऱ्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवावे व हिंसाचार थांबविण्याचे आवाहन संसदेनेही करावे, असे म्हटले. त्यापुढे जात, काश्मीर प्रश्नावर मध्य प्रदेशात बोलणार पंतप्रधान संसदेत का बोलायला तयार नाहीत, असा सवालही त्यांनी केला.गेल्या ३३ दिवसांपासून खोऱ्यात हिंसाचार सुरू आहे. काश्मिरींच्या चांगल्या भवितव्यासाठी आम्ही येथून शांतता राखण्याचे आवाहन येथून केले पाहिजे. देशाचा एकमुखी आवाज संसदेतून गेला पाहिजे. शिवाय सर्वपक्षीय शिष्टमंडळही तेथे पाठविण्यात यावे, असे आझाद म्हणाले. या संदर्भातील घोषणा लगेचच व्हावी कारण संसदेचे अधिवेशन येत्या दोन दिवसांत संपत आहे.