शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानासाठी आपचा मोदींना पाठिंबा

By admin | Updated: September 30, 2014 18:34 IST

दिल्ली विधानसभेत भाजप व आम आदमी पक्षात रस्सीखेच सुरु असली तरी २ ऑक्टोंबरपासून सुरु होणा-या स्वच्छता अभियानात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - दिल्ली विधानसभेत सत्तास्थापनेसाठी भाजप व आम आदमी पक्षात रस्सीखेच सुरु असला तरी २ ऑक्टोंबरपासून सुरु होणा-या स्वच्छता अभियानासाठी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र स्वच्छतेच्या नावाखाली सुरु असलेला भ्रष्टाचार संपवल्याशिवाय भारत स्वच्छ होणार नाही असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.  
केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांना २ ऑक्टोंबररोजी महात्मा गांधीजींच्या जयंत्तीनिमित्त सुरु होणा-या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आपने पाठिंबा दर्शवला असून अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला.  यात केजरीवाल म्हणतात, प्रत्येक भारतीयाला स्वच्छ भारत हवा आहे. आम्ही २ ऑक्टोंबरनंतरही दिल्लीत स्वच्छता मोहीम सुरुच ठेवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः वाल्मिकी सदन येथे हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत सहभागी होतील ही बाबही कौतुकास्पद असून यामुळे सर्वसामान्यांना प्रेरणाही मिळेल असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 
या अभियानाचे कौतुक करतानाच केजरीवाल यांनी स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकारला काही सुचनाही केल्या आहेत. सफाई कामगारांना न्याय मिळवून देणे, साफसफाईसाठी यंत्रांचा वापर, केवळ एक दिवस मोहीम न राबवता ती दररोज सुरु राबवावी अशा सूचनाही त्यांनी नायडूंना पाठवलेल्या पत्रात केल्या आहेत.