शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी टाळीने कोरोना रोखतात, मग आम्ही अजानने का नाही रोखू शकत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:47 IST

लॉकडाउनमुळे सामूहिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील तमाम मुस्लिम संघटनांनी देखील कोरोना व्हायरसचे संकट पाहता, मशिदीत नमाजसाठी एकत्र  न येण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र काही राजकीय नेत्यांकडून कोरोना व्हायरसच्या आपत्तीत देखील राजकारण करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने मुस्लिमांना अजानसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम बंगालमधील या टीएमसी नेत्याचे नाव अख्तर हुसैन आहे. देशात लॉकडाउन असताना देखील लोकांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळी वाजवून कोरोनाला रोखू शकतात तर मग कोरोनाला मात देण्यासाठी आपण प्रार्थना  का करू नये, असा अजब सवाल केला. पंतप्रधान मोदींनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच सायंकाळी पाच वाजता आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी लोकांना पाच मिनिटं टाळ्या, थाळी किंवा घंटी वाजविण्याचे आवाहन केले होते.

या संदर्भात हुसैन यांना माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, कोरोना व्हायरसवर आतापर्यंत लस निघाली का ? कोरोनाला अजानने रोखता येऊ शकते. लोक काही ना काही कारण काढून रस्त्यावर फिरत आहेत. मग अजानसाठी एकत्र आले तर काय बिघडतं असा उलट प्रश्न हुसैन यांनी केला.

लॉकडाउनमुळे सामूहिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील तमाम मुस्लिम संघटनांनी देखील कोरोना व्हायरसचे संकट पाहता, मशिदीत नमाजसाठी एकत्र  न येण्याचे आवाहन केले आहे.