झांसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या वर्षी ‘सार्क’ शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानला गेल्यानंतर भारतात परत येताना वॉन्टेड दहशतवाद्यांनाही आपल्यासोबत विमानात घेऊन यावे, असे उत्तर प्रदेशचे शहर विकासमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी म्हटले आहे.खान पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘जसे दहशतवाद्यांना कंदहार येथे नेण्यात आले होते, तसे मोदींनी परत येताना हव्या असलेल्या दहशतवाद्यांना पाकमधून विमानात सोबत आणावे.’ (वृत्तसंस्था)
मोदींनी अतिरेक्यांना सोबत आणावे -खान
By admin | Updated: July 14, 2015 02:03 IST