शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी - केजरीवाल

By admin | Updated: January 19, 2016 13:37 IST

रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी हकालपट्टी करून देशाची माफी मागावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून घेतल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले असून देशभरात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी करावी आणि संपूर्ण देशाची माफी मागावी' अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 
' त्या दलित मुलाचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे तर तो लोकशाही, सामाजिक मूल्यं आणि समानतेचा खून आहे. मोदीजींनी याप्रकरणी संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. 
ऑगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप होता. त्या घटनेनंतर तणावाखाली असलेल्या रोहितने अखेर रविवारी गळफास लावून आपले जीवन संपवले. या सर्व प्रकरणामुळे देशातले वातावरण तापले असून  रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल  सायबराबाद पोलिसांनी केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
 दरम्यान रोहितच्या आत्महत्येच्या निषेधार्थ पुण्यात एफटीआयआयचे विद्यार्थी एक दिवसाच्या उपोषणास बसले आहेत.