शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पराभवासाठी मोदी, शाह, जेटलींचे त्रिकुट जबाबदार - अरूण शौरी

By admin | Updated: November 9, 2015 11:02 IST

बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याची टीका अरूण शौरींनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणा-या भाजपाचा बिहार निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर भाजपावर चहूबाजूंनी टीका होत असून माजी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनीही भाजपा नेतृत्वावर टीकास्त्र सोडत 'बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याचा आरोप केला. भाजपा सरकारवर तसेच मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज असणा-या अरूण शौरींना गेल्या काही दिवसांपासून भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी मोदी, शहा व जेटलींना जबाबादर ठरवले आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा हे पक्ष नीट चालवत नसल्याची टीका करतानाच पक्षातच अध्यक्षांविरोधात मोहिम सुरू असल्याचे शौरी यांनी सुनावले. हा पराभव म्हणजे भाजपाला बसलेला जोरदार फटका असल्याचेही त्यांनी म्हटले. भाजपा सरकार सत्तेवर येऊन दीड वर्ष झालेले असतानाही कोणतेही काम झालेले नाही. जनतेचा पंतप्रधान मोदींवरचा विश्वास कमी झाल्याचेही शौरी यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख असतील, असे आश्वासन दिले होते, मात्र अमित शहांनी त्याला 'निवडणुकीचा जुमला' म्हटले. अशा स्थितीत लोकांचा पंतप्रधानांवरील विश्वास डळमळीत होणार नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.
बिहारमधील पराभवानंतर अमित शहा आणि जेटलींवर मोदी कारवाई करतील का असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता मोदी, शहा आणि जेटली हे तिघेही एकच असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे शक्यच नसल्याचे शौरी यांनी म्हटले.
दादरी हत्याकांड व देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरील पंतप्रधानांच्या मौनावरही शौरी यांनी टीका केली. पंतप्रधान प्रत्येक मुद्यावर स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असं त्यांचे मंत्री म्हणतात, पण देशाचे पंतप्रधान अनेक छोट्या मुद्यांवर ट्विट करत असतात, मग दादरीसारख्या संवेदनशील मुद्यांवर ते मौन कसे बाळगू शकतात? असा सवाल विचारत त्यांनी मोदींच्या भूमिकेवर नाराजी वर्तवली.