शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

बिहार पराभवासाठी मोदी, शाह, जेटलींचे त्रिकुट जबाबदार - अरूण शौरी

By admin | Updated: November 9, 2015 11:02 IST

बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याची टीका अरूण शौरींनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणा-या भाजपाचा बिहार निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर भाजपावर चहूबाजूंनी टीका होत असून माजी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनीही भाजपा नेतृत्वावर टीकास्त्र सोडत 'बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याचा आरोप केला. भाजपा सरकारवर तसेच मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज असणा-या अरूण शौरींना गेल्या काही दिवसांपासून भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी मोदी, शहा व जेटलींना जबाबादर ठरवले आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा हे पक्ष नीट चालवत नसल्याची टीका करतानाच पक्षातच अध्यक्षांविरोधात मोहिम सुरू असल्याचे शौरी यांनी सुनावले. हा पराभव म्हणजे भाजपाला बसलेला जोरदार फटका असल्याचेही त्यांनी म्हटले. भाजपा सरकार सत्तेवर येऊन दीड वर्ष झालेले असतानाही कोणतेही काम झालेले नाही. जनतेचा पंतप्रधान मोदींवरचा विश्वास कमी झाल्याचेही शौरी यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख असतील, असे आश्वासन दिले होते, मात्र अमित शहांनी त्याला 'निवडणुकीचा जुमला' म्हटले. अशा स्थितीत लोकांचा पंतप्रधानांवरील विश्वास डळमळीत होणार नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.
बिहारमधील पराभवानंतर अमित शहा आणि जेटलींवर मोदी कारवाई करतील का असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता मोदी, शहा आणि जेटली हे तिघेही एकच असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे शक्यच नसल्याचे शौरी यांनी म्हटले.
दादरी हत्याकांड व देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरील पंतप्रधानांच्या मौनावरही शौरी यांनी टीका केली. पंतप्रधान प्रत्येक मुद्यावर स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असं त्यांचे मंत्री म्हणतात, पण देशाचे पंतप्रधान अनेक छोट्या मुद्यांवर ट्विट करत असतात, मग दादरीसारख्या संवेदनशील मुद्यांवर ते मौन कसे बाळगू शकतात? असा सवाल विचारत त्यांनी मोदींच्या भूमिकेवर नाराजी वर्तवली.