शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

बिहार पराभवासाठी मोदी, शाह, जेटलींचे त्रिकुट जबाबदार - अरूण शौरी

By admin | Updated: November 9, 2015 11:02 IST

बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याची टीका अरूण शौरींनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणा-या भाजपाचा बिहार निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर भाजपावर चहूबाजूंनी टीका होत असून माजी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनीही भाजपा नेतृत्वावर टीकास्त्र सोडत 'बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याचा आरोप केला. भाजपा सरकारवर तसेच मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज असणा-या अरूण शौरींना गेल्या काही दिवसांपासून भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी मोदी, शहा व जेटलींना जबाबादर ठरवले आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा हे पक्ष नीट चालवत नसल्याची टीका करतानाच पक्षातच अध्यक्षांविरोधात मोहिम सुरू असल्याचे शौरी यांनी सुनावले. हा पराभव म्हणजे भाजपाला बसलेला जोरदार फटका असल्याचेही त्यांनी म्हटले. भाजपा सरकार सत्तेवर येऊन दीड वर्ष झालेले असतानाही कोणतेही काम झालेले नाही. जनतेचा पंतप्रधान मोदींवरचा विश्वास कमी झाल्याचेही शौरी यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख असतील, असे आश्वासन दिले होते, मात्र अमित शहांनी त्याला 'निवडणुकीचा जुमला' म्हटले. अशा स्थितीत लोकांचा पंतप्रधानांवरील विश्वास डळमळीत होणार नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.
बिहारमधील पराभवानंतर अमित शहा आणि जेटलींवर मोदी कारवाई करतील का असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता मोदी, शहा आणि जेटली हे तिघेही एकच असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे शक्यच नसल्याचे शौरी यांनी म्हटले.
दादरी हत्याकांड व देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरील पंतप्रधानांच्या मौनावरही शौरी यांनी टीका केली. पंतप्रधान प्रत्येक मुद्यावर स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असं त्यांचे मंत्री म्हणतात, पण देशाचे पंतप्रधान अनेक छोट्या मुद्यांवर ट्विट करत असतात, मग दादरीसारख्या संवेदनशील मुद्यांवर ते मौन कसे बाळगू शकतात? असा सवाल विचारत त्यांनी मोदींच्या भूमिकेवर नाराजी वर्तवली.