शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जम्मू-काश्मीर सरकारसाठी पुन्हा हालचालींना वेग लवकरच मोदी- सईद भेट : वाद निकाली काढण्यावर भर

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग आला असून भाजप आणि पीडीपीने किमान समान कार्यक्रमांवर वाटाघाटींना अंतिम आकार देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग आला असून भाजप आणि पीडीपीने किमान समान कार्यक्रमांवर वाटाघाटींना अंतिम आकार देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा त्रिशंकू राहिल्याने राष्ट्रपती राजवट लागू होऊन ५० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला असताना दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा मतभेद संपविण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. कलम ३७०, वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा, विघटनवाद्यांबद्दलचे धोरण तसेच या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंबंधी मुद्यांवर तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे.
८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीचे २८ तर भाजपचे २५ आमदार असून यापक्षाने भाजपसोबत रचनात्मक चर्चा चालविण्यासाठी सहा जणांची चमू स्थापन केली आहे. भाजपने चर्चेसाठी अर्थमंत्री अरुण जेटली आणि अरुणसिंग यांना नियुक्त केले असून पीडीपीचे शिष्टमंडळ शुक्रवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोदी आणि सईद यांच्यात सरकार स्थापण्यासंबंधी करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-------------------------
मुख्यमंत्रिपद पीडीपीकडे...
सईद यांना सहा वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याला भाजपने तत्त्वत: सहमती दर्शविल्यामुळे वाटाघाटीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. भाजपचे नेते निर्मलसिंग हे उपमुख्यमंत्री राहतील. दोन पक्षांदरम्यान मुंबई आणि चंदीगड येथे पार पडलेल्या चर्चेच्या मालिकेनंतर पीडीपीकडे गृह तर भाजपकडे अर्थमंत्रालय ठेवण्यावर सहमती झाली आहे.