शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

हाफीज सईदच्या उलट्या बोंबा, म्हणे पाकमधील दहशतवादी हल्ल्यासाठी मोदी जबाबदार

By admin | Updated: June 9, 2014 11:58 IST

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ९ -  मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवले आहे. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानेच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळेही त्याने उधळली आहे. दहशतवादी हल्ले घडवणा-या हाफीजने भारतालाच दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार ठरवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया भारतातून व्यक्त होत आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने सोमवारी ट्विटरवर कराची विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले.  कराचीतील दहशतवादी हल्ल्याची तेहरीक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली असूनही हाफीज म्हणतो, दहशतवाद्यांचा सामना करणा-या पाकिस्तानी सैन्याच्या जवानांना आमचा सलाम. या हल्ल्यामागे भारतातील नरेंद्र मोदींचे नवीन सुरक्षा पथक जबाबदार आहेत. संपूर्ण पाकला माहित आहे आपला खरा शत्रू कोण. पाकिस्तान सरकारने आता तरी भारताविरुध्द कणखर भूमिका घ्यावी असे हाफीज सईद म्हणतो. हाफीज प्रमुख असलेल्या जमात उद दावानेही ट्विटरद्वारे मोदी सरकारलाच या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवले आहे. हाफीजच्या या ट्विटवरुन भारतातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.