शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

....तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो जयंत पाटील : पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभारावर टिका

By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST

जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टिका केली आहे. ते पाल रा.रावेर येथील मेळाव्यानिमित्त जळगाव येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.

जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टिका केली आहे. ते पाल रा.रावेर येथील मेळाव्यानिमित्त जळगाव येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याची सुरुवात अकोला येथील कार्यक्रमातून केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चव्हाण यांना लक्ष्य करीत बाबांच्या चुकीच्या धोरणांमुळे सत्ता गेली असे विधान केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे बिल्डरांच्या फायली घेऊन यायचे. दबाव आणायचे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या खोट्या चौकशा लावल्या असा आरोपही केला जातो, असेही चव्हाण म्हणाले होते. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारभारावर टिका केली आहे.
प्रस्ताव कुणाचे हे बघितले जायचे
जयंत पाटील पुढे म्हणाले, आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात दिरंगाई, टाळाटाळ असे प्रकार सुरू झाले. मंजुरीसाठी आलेला प्रस्ताव कोणत्या पक्षाचा आहे हे बघितले जायचे. निर्णय घेतले जात नव्हते, असेही पाटील म्हणाले.
खडसेंची वापसी अशक्य
राज्य सरकारमधील मंडळीने ज्या पद्धतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निरोप दिला ते पाहता खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परततील, असे मला वाटत नाही. खडसे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्याबाबत खडसे निर्दोष बाहेर पडतात की नाही हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल, असेही पाटील म्हणाले.