शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मोदींनी लोकशाहीची हत्या केली - सोनिया गांधी

By admin | Updated: May 6, 2016 12:34 IST

मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 06 - मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाताखाली 'लोकतंत्र बचाव यात्रा'चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी ही टीका केली आहे. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मनमोहन सिंग यांनीदेखील भाषण करत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली .केंद्र सरकार लोकशाहीची हत्या करत आहेत, गरिबांकडे आणि खासकरुन शेतक-याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 
 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाताखाली 'लोकतंत्र बचाव यात्रा'चं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत जमा झाले आहेत. 
 
मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, महागाईने जगणं महाग झालं आहे, पण मोदी सरकार डोळे झाकून बसलं आहे. तसंच मोदी सरकार विद्यार्थ्यांवरही अन्याय करतंय, त्यांना देशद्रोही ठरवतंय असं सोनिया गांधी बोलल्या आहेत. संसदेत आणि बाहेरही मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात जोमाने उभं राहू. या मोर्चानंतर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जा आणि मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेचा बुरखा पाडा असं आवाहन सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना केलं. 
 
 
मोदीजी कुठे आहेत 'अच्छे दिन'? - राहुल गांधी
राहुल गांधी यांनीदेखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधत मोदीजी कुठे आहेत 'अच्छे दिन'? असा सवाल विचारला. एकीकडे देशभरात दररोज 50 शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे सरकार लोकशाहीचीही हत्या करत आहे.  देशभरात फक्त मोहन भागवत आणि नरेंद्र मोदीच बोलतात. त्यांच्याविरोधात बोलणं गुन्हा ठरवलं जात आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
 
नेत्यांची धरपकड आणि सुटका
जंतर मंतरपासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातच मोर्चा रोखत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए के अँटोनी आणि गुलाम नबी आझाद यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन करण्यास सुरुवेत केली. संसद रोड पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली. थोड्या वेळाने पोलिसांनी सोनिया गांधींसह इतर नेत्यांची सुटका केली.