शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

मोदी सरकारची धोरणे अस्पष्ट - मनमोहन सिंग

By admin | Updated: February 13, 2016 03:51 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्था कमजोर होत आहे आणि देशातील गुंतवणुकीचा

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्था कमजोर होत आहे आणि देशातील गुंतवणुकीचा दरही खाली आला आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर तोफ डागली.नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी पंतप्रधानांसारखेच वागले पाहिजे. जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यांनी मुजफ्फरनगर दंगल आणि दादरी हत्याकांडावर बोलायला हवे होते, असे मनमोहन सिंग म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था पुरती ढासळली आहे. पूर्वी होती तशी ती आता सुस्थितीत नाही. अर्थव्यवस्था बळकट असायला हवी होती. कारण सध्याचे वातावरण अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असेच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार केंद्रात होते त्या वेळी अर्थव्यवस्थेला एवढी अनुकूल परिस्थिती नव्हती. संपुआ सरकार सत्तेत असताना खनिज तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत प्रति बॅरल १५० डॉलर्सवर पोहोचली होती. आज ही किंमत ३० डॉलर्स प्रति बॅरलवर आली आहे. यामुळे निश्चितच चालू खात्याची तूट कमी झाली आहे. सरकारला वित्तीय तूट कमी करण्याची सरकारला नामी संधी मिळालेली आहे आणि या संधीचा फायदा घेऊन सरकारला अर्थव्यवस्थेत अधिक गुंतवणूक करता येऊ शकेल, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.मनमोहन सिंग पुढे म्हणाले, या अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि गुंतवणूक वाढवावी, असे व्यापारी समुदायाच्या गळी उतरविण्यात मोदी सरकारला अपयशच आले आहे. आज देशातील गुंतवणूक दर ३२ टक्क्यांनी कमी झाला आहे. आम्ही सत्तेवर असताना गुंतवणूक दर ३५ टक्क्यांनी वाढलेला होता. मोदी सरकारच्या अस्पष्ट धोरणांमुळे हा दर गेल्या दोन वर्षांत खाली आला आहे. संधी घेण्यात अपयश...भारत संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरत असल्याचे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आम्ही मालाचे आयातदार आहोत. याचा अर्थ कमी किंमत ही भारताच्या फायद्याचीच आहे. त्यामुळे दिलेल्या रकमेत संतुलन साधण्यात, महागाईला आळा घालण्यात मदत होणार आहे. मोदी सरकारला खनिज तेलाच्या कमी झालेल्या किमतीचा फायदा घेता आला नाही.