शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची धोरणे अस्पष्ट - मनमोहन सिंग

By admin | Updated: February 13, 2016 03:51 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्था कमजोर होत आहे आणि देशातील गुंतवणुकीचा

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्था कमजोर होत आहे आणि देशातील गुंतवणुकीचा दरही खाली आला आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर तोफ डागली.नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी पंतप्रधानांसारखेच वागले पाहिजे. जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यांनी मुजफ्फरनगर दंगल आणि दादरी हत्याकांडावर बोलायला हवे होते, असे मनमोहन सिंग म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था पुरती ढासळली आहे. पूर्वी होती तशी ती आता सुस्थितीत नाही. अर्थव्यवस्था बळकट असायला हवी होती. कारण सध्याचे वातावरण अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असेच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार केंद्रात होते त्या वेळी अर्थव्यवस्थेला एवढी अनुकूल परिस्थिती नव्हती. संपुआ सरकार सत्तेत असताना खनिज तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत प्रति बॅरल १५० डॉलर्सवर पोहोचली होती. आज ही किंमत ३० डॉलर्स प्रति बॅरलवर आली आहे. यामुळे निश्चितच चालू खात्याची तूट कमी झाली आहे. सरकारला वित्तीय तूट कमी करण्याची सरकारला नामी संधी मिळालेली आहे आणि या संधीचा फायदा घेऊन सरकारला अर्थव्यवस्थेत अधिक गुंतवणूक करता येऊ शकेल, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.मनमोहन सिंग पुढे म्हणाले, या अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि गुंतवणूक वाढवावी, असे व्यापारी समुदायाच्या गळी उतरविण्यात मोदी सरकारला अपयशच आले आहे. आज देशातील गुंतवणूक दर ३२ टक्क्यांनी कमी झाला आहे. आम्ही सत्तेवर असताना गुंतवणूक दर ३५ टक्क्यांनी वाढलेला होता. मोदी सरकारच्या अस्पष्ट धोरणांमुळे हा दर गेल्या दोन वर्षांत खाली आला आहे. संधी घेण्यात अपयश...भारत संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरत असल्याचे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आम्ही मालाचे आयातदार आहोत. याचा अर्थ कमी किंमत ही भारताच्या फायद्याचीच आहे. त्यामुळे दिलेल्या रकमेत संतुलन साधण्यात, महागाईला आळा घालण्यात मदत होणार आहे. मोदी सरकारला खनिज तेलाच्या कमी झालेल्या किमतीचा फायदा घेता आला नाही.