शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

देशाच्या सीमारेषेवर मोदी सरकारची 'भारतमाला'

By admin | Updated: April 29, 2015 11:40 IST

देशाच्या सीमारेषेवर दळणवळणाच्या सुविधेचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने सीमारेषेवर 'भारतमाला' प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - देशाच्या सीमारेषेवर दळणवळणाच्या सुविधेचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने सीमारेषेवर 'भारतमाला' प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुजरात ते मिझोरामपर्यंतच्या सीमारेषेला जोडण्यासाठी तब्बल ५,३०० किलोमीटरचा रस्ता विकसीत केला जाणार आहे. 

चीनसारखा शेजारी राष्ट्र सीमारेषेवर पायाभूत सुविधा निर्माण करत असून रस्ते व लोहमार्गाच्या माध्यमातून सीमारेषा जोडण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. आता मोदी सरकारही  भारताच्या सीमारेषेवर रस्त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पात गुजरातपासून ते मिझोरामपर्यंतच्या सीमारेषेवर रस्ता बांधला जाईल. हा रस्ता गुजरातमधून राजस्थान, पंजाबमार्गे हिमाचलप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडपर्यंत जाईल. उत्तराखंडहून उत्तरप्रदेशमधील सीमा रेषेवरुन बिहार, सिक्कीम, आसाम, अरुणाचलप्रदेश, मणिपूर व मिझोराम या राज्यांमधील सीमारेषेपर्यंत हा रस्ता नेला जाईल. या प्रकल्पात ५ हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते नव्याने बांधावे लागतील असे समजते. यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये ऐवढा खर्च अपेक्षीत आहे. या प्रकल्पाला विविध खात्यांकडून नियोजित वेळेत परवानगी मिळाल्यास चालू वर्षातच रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकेल असे केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. या प्रकल्पात आर्थिक अडचणीपेक्षा भूसंपादन प्रक्रीया व पर्यावरण खात्याची मंजूरी मिळवणे ही प्रमुख अडचण असल्याचे एका अधिका-याने सांगितले.