शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

देशाच्या सीमारेषेवर मोदी सरकारची 'भारतमाला'

By admin | Updated: April 29, 2015 11:40 IST

देशाच्या सीमारेषेवर दळणवळणाच्या सुविधेचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने सीमारेषेवर 'भारतमाला' प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - देशाच्या सीमारेषेवर दळणवळणाच्या सुविधेचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने सीमारेषेवर 'भारतमाला' प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुजरात ते मिझोरामपर्यंतच्या सीमारेषेला जोडण्यासाठी तब्बल ५,३०० किलोमीटरचा रस्ता विकसीत केला जाणार आहे. 

चीनसारखा शेजारी राष्ट्र सीमारेषेवर पायाभूत सुविधा निर्माण करत असून रस्ते व लोहमार्गाच्या माध्यमातून सीमारेषा जोडण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. आता मोदी सरकारही  भारताच्या सीमारेषेवर रस्त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पात गुजरातपासून ते मिझोरामपर्यंतच्या सीमारेषेवर रस्ता बांधला जाईल. हा रस्ता गुजरातमधून राजस्थान, पंजाबमार्गे हिमाचलप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडपर्यंत जाईल. उत्तराखंडहून उत्तरप्रदेशमधील सीमा रेषेवरुन बिहार, सिक्कीम, आसाम, अरुणाचलप्रदेश, मणिपूर व मिझोराम या राज्यांमधील सीमारेषेपर्यंत हा रस्ता नेला जाईल. या प्रकल्पात ५ हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते नव्याने बांधावे लागतील असे समजते. यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये ऐवढा खर्च अपेक्षीत आहे. या प्रकल्पाला विविध खात्यांकडून नियोजित वेळेत परवानगी मिळाल्यास चालू वर्षातच रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकेल असे केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. या प्रकल्पात आर्थिक अडचणीपेक्षा भूसंपादन प्रक्रीया व पर्यावरण खात्याची मंजूरी मिळवणे ही प्रमुख अडचण असल्याचे एका अधिका-याने सांगितले.