शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

... तर मोदी सरकार ट्रिपल तलाकसंदर्भात पाऊल उचलेल

By admin | Updated: May 20, 2017 22:30 IST

मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 20 - मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे. 
 
केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले की, ""मुस्लिम समाजानं स्वतःहून ट्रिपल तलाकची प्रथा बदलावी. अन्यथा अशी परिस्थिती निर्माण होईल की सरकारला यासंबंधी निर्बंध आणण्यासाठी कायदा अंमलात आणावा लागेल. हे कोणत्याही खासगी प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखे नाही उलट महिलांच्या न्याय्यहक्कांचा प्रश्न आहे. सर्व महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. कायद्यासमोर सर्व समान, हा मुद्दा आहे.""
 
यावेळी व्यकंय्या असेही म्हणाले की, ""हिंदू समाजात बालविवाह, सती आणि हुंडा यांसारख्या वाईट प्रथांना संपुष्टात आणण्यासाठी कायदा अंमलात आणला गेला आहे"". 
 
""हिंदू समाजानं बालविवाहवर चर्चा केली आणि यावर निर्बंध आणण्यासाठी संसदेत कायदा पारित करण्यात आला. दुसरी सती प्रथा ज्यात पतीच्या निधनानंतर पत्नीनंही पतीच्या अंतिमसंस्कारावेळी मृत्यूला कवटाळण्याची प्रथा कायद्याअंतर्गत बंद करण्यात आली. तिसरा प्रथा हुंडा, यासाठी कायदा पारित करण्यात आल्यानंतर हिंदू समाजानं तो स्वीकारला"", असेही व्यकंय्या नायडू यांनी यांनी यावेळी सांगितले.
 
""समाजविरोधी प्रथांसंदर्भात हिंदू समजानं चर्चा केली व त्यात सुधारणा आणली. आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहे. मनुष्याला मनुष्याच्या रुपात पाहा, धर्मांमध्ये त्यांचे विभाजन करू नका. याच भेदभावातून महिलांवरही अन्याय होऊ नये "", असेही ते म्हणालेत.