शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

... तर मोदी सरकार ट्रिपल तलाकसंदर्भात पाऊल उचलेल

By admin | Updated: May 20, 2017 22:30 IST

मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 20 - मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे. 
 
केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले की, ""मुस्लिम समाजानं स्वतःहून ट्रिपल तलाकची प्रथा बदलावी. अन्यथा अशी परिस्थिती निर्माण होईल की सरकारला यासंबंधी निर्बंध आणण्यासाठी कायदा अंमलात आणावा लागेल. हे कोणत्याही खासगी प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखे नाही उलट महिलांच्या न्याय्यहक्कांचा प्रश्न आहे. सर्व महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. कायद्यासमोर सर्व समान, हा मुद्दा आहे.""
 
यावेळी व्यकंय्या असेही म्हणाले की, ""हिंदू समाजात बालविवाह, सती आणि हुंडा यांसारख्या वाईट प्रथांना संपुष्टात आणण्यासाठी कायदा अंमलात आणला गेला आहे"". 
 
""हिंदू समाजानं बालविवाहवर चर्चा केली आणि यावर निर्बंध आणण्यासाठी संसदेत कायदा पारित करण्यात आला. दुसरी सती प्रथा ज्यात पतीच्या निधनानंतर पत्नीनंही पतीच्या अंतिमसंस्कारावेळी मृत्यूला कवटाळण्याची प्रथा कायद्याअंतर्गत बंद करण्यात आली. तिसरा प्रथा हुंडा, यासाठी कायदा पारित करण्यात आल्यानंतर हिंदू समाजानं तो स्वीकारला"", असेही व्यकंय्या नायडू यांनी यांनी यावेळी सांगितले.
 
""समाजविरोधी प्रथांसंदर्भात हिंदू समजानं चर्चा केली व त्यात सुधारणा आणली. आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहे. मनुष्याला मनुष्याच्या रुपात पाहा, धर्मांमध्ये त्यांचे विभाजन करू नका. याच भेदभावातून महिलांवरही अन्याय होऊ नये "", असेही ते म्हणालेत.