शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

... तर मोदी सरकार ट्रिपल तलाकसंदर्भात पाऊल उचलेल

By admin | Updated: May 20, 2017 22:30 IST

मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 20 - मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे. 
 
केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले की, ""मुस्लिम समाजानं स्वतःहून ट्रिपल तलाकची प्रथा बदलावी. अन्यथा अशी परिस्थिती निर्माण होईल की सरकारला यासंबंधी निर्बंध आणण्यासाठी कायदा अंमलात आणावा लागेल. हे कोणत्याही खासगी प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखे नाही उलट महिलांच्या न्याय्यहक्कांचा प्रश्न आहे. सर्व महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. कायद्यासमोर सर्व समान, हा मुद्दा आहे.""
 
यावेळी व्यकंय्या असेही म्हणाले की, ""हिंदू समाजात बालविवाह, सती आणि हुंडा यांसारख्या वाईट प्रथांना संपुष्टात आणण्यासाठी कायदा अंमलात आणला गेला आहे"". 
 
""हिंदू समाजानं बालविवाहवर चर्चा केली आणि यावर निर्बंध आणण्यासाठी संसदेत कायदा पारित करण्यात आला. दुसरी सती प्रथा ज्यात पतीच्या निधनानंतर पत्नीनंही पतीच्या अंतिमसंस्कारावेळी मृत्यूला कवटाळण्याची प्रथा कायद्याअंतर्गत बंद करण्यात आली. तिसरा प्रथा हुंडा, यासाठी कायदा पारित करण्यात आल्यानंतर हिंदू समाजानं तो स्वीकारला"", असेही व्यकंय्या नायडू यांनी यांनी यावेळी सांगितले.
 
""समाजविरोधी प्रथांसंदर्भात हिंदू समजानं चर्चा केली व त्यात सुधारणा आणली. आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहे. मनुष्याला मनुष्याच्या रुपात पाहा, धर्मांमध्ये त्यांचे विभाजन करू नका. याच भेदभावातून महिलांवरही अन्याय होऊ नये "", असेही ते म्हणालेत.