शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’

By admin | Updated: January 14, 2015 05:17 IST

मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली

नवी दिल्ली : मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली. मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन आणि अन्य वटहुकुमांना जोरदार विरोध करण्याचा निर्धार हे मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचे वैशिष्ट्य राहिले. मात्र पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावरील जबाबदारीच्या विस्ताराचा विषय या बैठकीत निघालाच नाही.बैठकीचा प्रारंभ करतानाच सोनिया यांनी मोदी सरकारवर सडेतोड टीका केली. संपुआ सरकार घटनात्मक मत अजमावत निर्णय घेत होते. वटहुकूम हा न्यायालयीन प्रक्रियेतील अखेरचा उपाय ठरत असताना मोदी सरकार मात्र सुप्रशासनाच्या नावाखाली वटहुकुमाचा धोकायदायक वापर करीत आहे, असे त्या म्हणाल्या. यापूर्वीच्या संपुआ सरकारने भूसंपादन कायदा दीर्घ चर्चा आणि सल्लामसलत करून आणला होता़ मोदी सरकारने त्यात हवी ती दुरुस्ती घडवून आणण्यासाठी वटहुकुमाचा आधार घेतला आहे. ऐतिहासिक भूसंपादन विधेयकाची पूर्णपणे वाट लावत ब्रिटिशांनी पारित केलेला कायदा मागील दाराने आणला आहे. वटहुकूम आणण्याची एवढी घाई का? त्यामागे छुपा हेतू असल्याचा प्रश्न उपस्थित होतो. कोळसा खाणींसंबंधी वटहुकुमामुळे कोळसा खाणींच्या राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे, असेही त्या म्हणाल्या.