शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

"जनतेला मूर्ख बनवलं जातंय, सिंधूचे पाणी अडवायला २० वर्षे लागतील"; अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:19 IST

मोदी सरकारकडे सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

Swami Avimukteshwaranand Saraswati on Indus Waters Treaty Suspend:जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू करारावर स्थगिती देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या दोन तासांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंधू जल कारारासंदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयावरुन पाकिस्तानाने टीका केलीय. दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारकडे सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे म्हटलं आहे. जनतेला मूर्ख बनवले जात आहे असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, २३ एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानसोबतचा 'सिंधू पाणी करार स्थगित करण्याबाबत शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाची बैठक झाली.बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, असे म्हटलं. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठा दावा केला आहे. सिंधू नदीचे पाणी अडवण्यासाठी भारताला २० वर्षे लागतील असे त्यांनी म्हटलं.

"आम्ही माहिती काढली की सिंधू नदीचे पाणी थांबवण्याची कोणती व्यवस्था भारत सरकारकडे आहे. तेव्हा माहिती मिळाली की भारताकडे सिंधू नदीचे पाणी अडवण्यासाठी कोणतीच व्यवस्था भारताकडे नाही. जर भारताला सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात जाण्यापासून थांबवण्यासाठी व्यवस्था करायला लागली तर कमीत कमी २० वर्षे लागतील. पैसे किती लागतील याचा विचारच करु नका. कमीत कमी २० वर्षांचा वेळ लागेत तेव्हा सिंधू नदीचे पाणी भारत आपल्याकडे अडवू शकेल. तुम्ही म्हणताय की आम्ही सिंधू नदीचे पाणी थांबवू. याचा अर्थ जनतेला मूर्ख बनवलं जातंय. ज्यांचे अपयश आहे त्यांना पकडलं पाहिजे," असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

"काश्मीरमध्ये हल्ला झाला, मी ऐकले आहे की सरकार चार धाम यात्रा (उत्तराखंडमध्ये) पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. पण मला वाटतं यात्रा पुन्हा सुरू झाली पाहिजे. आता खात्री झाली आहे की कोणीतरी हिंदूंना आव्हान देत आहे. जर असे आव्हान असेल तर सरकारने आव्हान स्वीकारले पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे. अतिरेकी सहजपणे घुसले, शस्त्रे घेऊन आले, लोकांना मारले आणि नंतर निघून गेले. या घटनेवरून असे दिसून येते की सर्व हिंदूंनी स्वतःला सुरक्षित करण्याचा विचार केला पाहिजे. जर गरज असेल तर हिंदूंनी स्वतःच्या शस्त्रांनी स्वतःचे रक्षण केले पाहिजे. ते म्हणतात की ते चौकीदार आहेत, पण तरी अतिरेक्यांना प्रतिकार करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. जर ते पाकिस्तानातून आले असतील तर कारवाई झाली पाहिजे. या घटनेतून आपल्याला शिकण्याची गरज आहे. सगळ्यात आली आपल्याला अशा लोकांना जबाबदार धरण्याची, शिक्षा देण्याची गरज आहे ज्यांनी आपले रक्षण करण्यात चूक केली आहे. नंतर, जर बाहेरचा कोणाचा हात असेल तर आपण त्यांच्यावरही हल्ला केला पाहिजे," असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी