शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी मोदी सरकारही कठोर ?

By admin | Updated: July 6, 2014 12:51 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर तिखट शब्दात टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी मात्र यूपीए सरकारचे धोरणच पुढे नेतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर तिखट शब्दात टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी मात्र यूपीए सरकारचे धोरणच पुढे नेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. मोदी सरकार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला विरोध करणार असल्याचे वृत्त आहे. 
१९ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सात जणांना तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. माजी पंतप्रधानांचे मारेकरी तुरुंगातून सुटत असतील तर  सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल अशा शब्दात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता.यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर स्थगिती आणून प्रकरण संविधान पीठाकडे पाठवले होते. 
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी काँग्रेसवर हल्लाबोल करुन केंद्रात सत्तेवर विराजमान झाले असले तरी राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी एनडीए सरकारही कठोर भूमिकाच घेईल अशी चर्चा आहे. फेब्रुवारीमध्ये तामिळनाडू सरकारच्या निर्णयावर भाजपचे नेते अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांनी नाराजी दर्शवली होती. आता हे दोन्ही नेते केंद्रीय अर्थमंत्री आणि कायदा मंत्री यापदावर आहेत. मंगळवारी सुप्रीम कोर्टात राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी आहे. या सुनावणीत मोदी सरकार मारेक-यांना सोडण्याच्या निर्णयाला विरोधच दर्शवेल असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले तरी दहशतवाद आणि माजी पंतप्रधानांच्या मारेक-यांविषयी भाजप सौम्य भूमिका घेणार नाही असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्ट राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारच्या अखत्यारित येतो का तसेच फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देणे योग्य आहे का यावर निर्णय देण्याची शक्यता आहे.