शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मोदी सरकारला 3 वर्ष, मंत्र्यांना मिळाला ‘होमवर्क’

By admin | Updated: April 9, 2017 21:38 IST

येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने सरकारने सर्व मंत्रालयांना 5-5 यशस्वी कामांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - येत्या 26 मे रोजी  मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने सरकारने सर्व मंत्रालयांना 5-5 यशस्वी कामांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. 
 
भाजपा सत्तेत आल्यापासून काय बदल घडवून आणला आणि सामान्य नागरिकांना काय फायदा झाला  हे संबंधित मंत्र्यांना सांगावं लागणार आहे. यासंबंधी केंद्रीय  माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्व मंत्रालयांना एक पत्र पाठवल्याचं वृत्त आहे. यामध्ये सर्व मंत्र्यांना आपल्या आपल्या मंत्रालयाच्या योजना आणि कामाची माहिती देण्यास सांगण्यात आल्याचं समजतंय. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
मंत्र्यांना केलेल्या कामांची यादीच मंत्र्यांना सादर करावी लागणार आहे.  सत्तेत आल्यानंतर केलेली कामे, जनतेला फायदा झाला असेल आणि लोकांनी कौतुक केले असेल अशी पाच यशस्वी कामे. मंत्रालयांनी मिळवलेले मोठे यश, मंत्रालयाची खास कामगिरी दाखवणारे काम,  सुधारणांबाबत सूचना, मंत्रालयाच्या योजनांची पूर्ण माहिती.  2014 मध्ये काय स्थिती होती आणि 2017 मध्ये काय प्रगती झाली याचा लेखाजोखा मागवण्यात आला आहे. नायडू यांनी पाठवलेल्या पत्रात केवळ बुलेट फॉर्ममध्ये 3 पानांची नोट तयार करण्यास सांगितले आहे. सर्व मंत्रालयांच्या माहितीच्या आधारे एक डाटा बुकलेटही तयार केले जाईल आणि ते 26 मे पूर्वी प्रकाशित केले जाईल.
 
यापूर्वीही 21 मार्चला एका पत्रात व्यंकय्या नायडू यांनी मंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना सध्याच्या एनडीए सरकारने केलेल्या सकारात्मक बदलांबाबत माहिती देण्यास सांगितले होते.