शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी सरकारचे अखेर घूमजाव

By admin | Updated: October 18, 2014 02:29 IST

ज्या भारतीयांनी देशात कमावलेला काळा पैसा विदेशी बँकांमध्ये नेऊन ठेवला आहे त्यांची नावे त्या त्या देशांकडून मिळाली तरी ती उघड करता येणार नाहीत,

काळा पैसा : नावे गुपितच ठेवणार
नवी दिल्ली : ज्या भारतीयांनी देशात कमावलेला काळा पैसा विदेशी बँकांमध्ये नेऊन ठेवला आहे त्यांची नावे त्या त्या देशांकडून मिळाली तरी ती उघड करता येणार नाहीत, अशी भूमिका नरेंद्र मोदी यांच्या ‘रालोआ’ सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात घेतली व तसे करण्याची मुभा मिळावी यासाठी एक अजर्ही सादर केला. आधीच्या काँग्रेस प्रणीत ‘संपुआ’ सरकारच्या अशाच भूमिकेवर संसदेत व संसदेबाहेरही रान उठवून विदेशांतील काळा पैसा भारतात परत आणण्याची आणि तो कोणाकोणाचा आहे हे जगजाहीर करण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने घूमजाव केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
याआधी न्यायालयाने विदेशातील काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी विशेष तपासी पथक (एसआयटी) स्थापन करताना याकामी पूर्ण पारदर्शकता पाळण्याचे निर्देश दिले होते. त्यातून सूट मिळावी यासाठी केलेल्या अर्जाचा अॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी मुख्य न्यायाधीश न्या. एच.एल. दत्तु यांच्या खंडपीठापुढे विशेष उल्लेख केला आणि त्यावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले. ज्यांच्या जनहित याचिकेवरून न्यायालयाने हा विषय हाती घेतला आहे ते ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी सरकारच्या या अर्जास जोरदार आक्षेप घेतला व न्यायालयाने तो अजिबात विचारात घेऊ नये, असे ठाम मत मांडले. ते म्हणाले की, खरेतर असा अर्ज (ज्यांनी काळा पैसा दडविला आहे अशा) गुन्हेगारांनी करायला हवा, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने नव्हे. असा अर्ज करून सरकार  काळा पैसा परदेशात नेऊन ठेवणा:यांना पाठीशी घालू पाहात आहे, असा आरोपही त्यांनी 
केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
1 न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या ‘एसआयटी’च्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. एम.बी. शहा  आहेत व आणखी एक निवृत्त न्यायाधीश न्या. अरिजित पसायत उपाध्यक्ष आहेत. खरेतर अशा ‘एसआयटी’च्या स्थापनेची औपचारिक अधिसूचना काढण्यासाठी न्यायालयाने ठरवून दिलेली मुदत संपण्यापूर्वीच आधीचे संपुआ सरकार सत्तेवरून गेले. 
2त्यामुळे एक अपरिहार्यता म्हणून मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच दिवशी एसआयटी स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. तरी याचा ‘काळ्या पैशाविरुद्धच्या लढय़ाची दमदार सुरुवात’ असा डंका पिटला गेला.
 
च्ज्या देशांबरोबर भारताने दुहेरी करआकारणी टाळण्याविषयीचे करार केले आहेत अशा देशांकडून मिळणारी काळ्या पैशासंबंधीची सर्व माहिती उघड करता येणार नाही. अशा देशांनी माहिती उघड करण्यास आक्षेप घेतला आहे. जर्मनीशी असा करार झालेला आहे. जर्मनीच्या बँकांमधील भारतीय खातेदारांची माहिती सरकारला मिळाली आहे, पण ती उघड करण्यास जर्मनीने गंभीर आक्षेप घेतला आहे. - अॅटर्नी जनरल, रोहतगी