शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

मोदी सरकार उद्योगपतींच्या बाजूचे - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:22 IST

मध्य प्रदेशात आम्ही सत्तेवर आलो, तर १0 दिवसांत शेतक-यांची कर्जे माफ करू, त्यासाठी ११ वा दिवसही उजाडणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शेतक-यांच्या मेळाव्यात दिले.

मंदसौर : मध्य प्रदेशात आम्ही सत्तेवर आलो, तर १0 दिवसांत शेतक-यांची कर्जे माफ करू, त्यासाठी ११ वा दिवसही उजाडणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शेतक-यांच्या मेळाव्यात दिले. मोदी सरकार उद्योगपतींच्या बाजूचे असल्याची टीका राहुल यांनी केली.मंदसौरच्या पिपलिया मंडी येथे हा मेळावा झाला. येथे गेल्या वर्षी ६ जूनला आंदोलन करणाºया ६ शेतकºयांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ झालेल्या मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ तसेच ज्योतिरादित्य सिंदिया हेही यावेळी उपस्थित होते.आमची सरकारे असलेल्या कर्नाटक व पंजाबमध्ये आम्ही लगेचच शेतकºयांची कर्जे माफ केल्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन २0१४ साली दिले होते. पण देशातील जनतेला त्यातील एकही पैसा आजतागायत मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)कुटुंबीयांची घेतली भेटमृत शेतकºयांचे नातेवाईकही तिथे येणार होते. पण सरकारी अधिकाºयांनी आपणास तिथे जाऊ दिले नाही, असे या नातेवाईकांनी सांगितले.काही मृत शेतकºयांचे नातेवाईक सरकारी नोकरीत आहेत. तु्म्ही राहुल गांधी यांना भेटायला गेल्यास, तुमच्या नोकºया धोक्यात येतील, असे अधिकाºयांनी आम्हाला सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र राहुल गांधी यांनी मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.अडीच लाख कोटींची कर्जे माफमोदी सरकारने आतापर्यंत १५ उद्योगपतींची अडीच लाख कोटींची कर्जे लगेच माफ केली. मात्र शेतकºयांची कर्जे माफ करावीत, शेतमालाला चांगला भाव द्यावा, असे सरकारला वाटत नाही, अशी टीका करून राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या काळात शेतकºयांसाठी देण्यात आलेल्या ७0 हजार कोटींच्या पॅकेजचा आवर्जून उल्लेख केला. मोदी सरकारला शेतकºयांचे प्रश्न सोडवण्याची अजिबात इच्छाच नाही, असा आरोप करून, त्यामुळेच शेतकºयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, असे नमूद केले

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी